Sant Santaji Maharaj Jagnade
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 3)
मी सुरूवातीलाच मांडले मत असावीत या मतातुन संघटना उभी रहाते. सन 2010 पुर्वी जे मोजके शिलेदार खा. तडस साहेबाकडे होते त्यांना केशरकाकुंचे मार्गदर्शन होते. त्यांच्या विचाराचा प्रभाव होता तडस साहेबांची संघटन प्रणाली होती. पुण्या सारख्या परिसरात शेकडो जन यात झोकुन देऊन उभे होते. त्यांचे नेतृत्व आकाराला येऊ लागले होते. पण पुढील वाटचालीत यातील बरीच वयोवृद्ध झाले काहींना निर्णय प्रक्रिये पासुन दुर ठेवले. काहींना घरचा रस्ता दाखवला गेला. याच ठिकाणी नाराजीची लागन मुळ धरू लागली.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 2)
स्वातंत्र्याच्या पहिल्या काळात देशात विखुरलेल्या तेली समाजातील अनेक पोट शाखा एकत्र आल्या त्यांनी तैलिक संघटना स्थापन केली. उद्देश काय तर समाजाचे सामाजीक संघटन व्हावे सामाजीक सांस्कृतीक प्रश्न मिटावेत. या साठी दिल्ली येथे मुहर्तमेड रोवली.. त्या काळात दिग्रज येथिल कै. माधवराव पाटील आमदार होते. त्यांनी देशपातळीवरील पदाधीकार्यांना बोलावून महाराष्ट्रभर परिषद्या लावल्या दुर्देव आसे विदर्भ वगळता याला जनाधार मिळाला नाही. पण जेंव्हा समाजमाता कै. केशारकाकु यात सामिल झाल्या तेंव्हा बर्याच बांधवांना त्यांनी याची गरज पटवुन दिली. मा. खा. शांताराम पोटदुखे यांची साथ ही मिळाली. आणी तैलीक महासभेचा पाया त्यांनी इथे निर्माण केला. त्या वेळी त्या खासदार होत्या. आशा वेळी अहमदनगर येथील सभेत त्यावळचे आमदार श्री. रामदास तडस हे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. तरूण नेतृत्व त्यात खेळाडु. संघटन कसे बांधावे याची प्रत्यक्ष अनुभवातुन जाणिव. हेवे दावे आपण मिटवायला आहो ही जिद्द. समाज जागा झाला पाहिजे ही धडपड. आपल्या साध्या शब्दाने ही समाज विस्कटु शकतो. ही नजर. या नजरेत आम्ही कुठे चुकलो किंवा समाजातील सामान्य बांधवांने जी चुक समोर आणली तर ती प्रांजळ पणे मान्य करून सुधारणे ही पैलवानी प्रकृती.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 1)
कोणत्या ही संघटनेच्या वाटचालीत अव्हाने असावीत सोबतीला वादळे ही असावीत. त्या संघटनेच्या वाटचाली बद्दल चर्चा व्हावी, त्या संघटनेच्या यशा बरोबर अपयशाचा आराखडा उभा केला जावा. त्या संघटनेच्या पदाधीकार्यांच्या धोरणा बद्दल कौतुक ही व्हावे तेवढेच चुका बद्दल चर्चा ही व्हावी. आणी नुसतीच भाटगीरी असेल तर ती संघटना ही हुकूमशाहीच्या बाजुने वाटचाल करून कायमची उभी रहाते किंवा नामशेष होत आसते. हा इतिहास आसल्या कारणाने तैलिक संघटने विषयी जे सध्या वादळ उभे राहिले तेंव्हा या बद्दल जनमानसात जे चालले आहे ते मांडत आहे. मान, पद मिळविण्यासाठी, मग ते पद टिकवण्यासाठी, मग मला का हाकलुन लावले या साठी. मी म्हणतो तेच सत्य किंवा सत्य असेल ते माझे ही वृत्ती न रहाता स्व केंद्रित जी वृत्ती बोकाळलेली आहे.
दिनांक 8-5/2016 या दिवशी कणकवली येथे संताजी महाराज चौकाचे नामकरण संपन्न झाले.
कणकवली तेथे समाजाच्या प्रयत्नातुन कनकवली नगर परिषदेच्या संमतीने तेली आळी येथे, मा. श्री. जनार्दन गोपाळ जगनाडे (अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे ) यांच्या शुभ हस्ते. श्री. संत शिरोमणी संताजी महाराज चौक नामकरण सोहळा पार पडला.
दिनांक ०८ जानेवारी २०१६ श्री संताजी जगनाडे महाराज ह्यांची ३१६ वी पुण्यतिथी निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, शूर्परक शाखेतर्फे शाखेचे अध्यक्ष तसेच आपल्या श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ "तेली समाज", वसई-विरार-पालघर चे कार्याध्यक्ष मा. श्री. रमाकांत वाकचौडे (बापू) ह्यांनी आज त्यांच्या नालासोपारा पश्चिम सभागृहामध्ये साजरी केली, तद्वेळी सदर कार्यक्रमास को. म. सा. प., शुर्पारक शाखेचे कार्यकारिणी सदस्य व आपल्या मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भगवान बोरसे, सचिव श्री. वैभव झगडे, सल्लागार श्री नामदे गुरुजी, श्री जाधव सर, को. म. सा. प., शुर्पारक शाखेचे सदस्य आणि मंडळाचे कार्यकारिणी सदस्य कु. आशिष रसाळ, श्री साखरकर साहेब, महिला अध्यक्षा सौ पुष्पा बोरसे, सौ सौंदळकर मामी, सौ साखरकर मॅडम हे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.