Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
नाव सार्थक करणारे खा. तडस ! - प्रफुल्ल व्यास, वरिष्ठ उपसंपादक, दै. तरूण भारत, वर्धा
नावात काय आहे ? असे शेक्सपिअरने म्हंटले. परंतु आपल्या संस्कृतीत नाव ठेवण्याचाच कार्यक्रम (बारसे) धुमधडाक्यात केले जाते. याचा अर्थ नावातच सर्वकाही आहे. आईने ठेवलेलेे नाव यथार्थ कसे करायचेे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. देवळी सारख्या छोट्याशा तालुका स्थानावरून राजकारणाची सुरूवात करणार्या खासदार रामदासजी तडस यांनी आईने ठेवलेेले नाव सार्थक लावण्याचा जणू चंगच बांधला असल्याचे त्यांच्या कार्यशैलीतुन स्पष्ट होते.
![]()
तेली समाज संघटनेची दिशा मा. खासदार तडस साहेबा कडून शिकुया. - विजय काळे, अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा नगर
आम्हा समविचारी बाधवांना समाज कार्य करण्यात नवखेपणा होता तेंव्हा नगर वासीयांनी देश पातळीवरील समाजाचा विचार मेळावा नगर येथे ठेवला होता. पहिल्या सत्रात समाजमाता केशकाकु यांची निवड देशपातळीवर झाली. त्यावेळी तडस साहेब विधान परिषदेत आमदार होते. मी कसा तेली समाजामुळे आमदार झालो. आणि म्हणून आपन एक झालो तर आपले हक्क मिळवू शकतो.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
![]()
तेली समाजाची संघर्षाची वाटचाल म्हणजे खा. तडस - प्रकाश गिधे उपाध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पु. जि.
मी तसा चळवळीतला माणुस दत्ता सामंत यांच्या संघटेनेचा घटक. तो मिल कामगारांचा लढा लढलो आणी गिरणीबंद पडताच गावाकडे आलो. जवळ होते शुन्य उभा राहिली आणी संघर्ष सुरू केला. हा संघर्ष एकट्याचा. माझे गाव डोंगर दर्यातले सर्व साधने कमी अंगावर पाऊस घेऊन लढताना जाणवले मी एकटा आहे. परंतु माझ्या सारखे परिस्थीतीने गंजलेले माझ्या गावात माझ्या तालुक्यात, हजारो आहेत. ही सर्व मंडळी पिचत भरडत रडत आहेत. त्याच्या जगण्याची धडपडीची जाणीव कुणालाच नाही. आपन एकत्र येऊ ही ओळख ही नव्हती आणी आपन असेच पोटातले दु:ख उरात ठेवून वावरावे ही आमची ठेवन होती.
![]()
समाज संघटन कसे असावे हे खा. तडसांनी राबवले आहे. - ज्ञानेश्वर दुर्गुडे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पुणे जिल्हा.
भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी कळसू बाईचा डोंगर कपारीतून बाहेर पडलो. भाकरी किती महाग असते हे होरपळून निघाल्या नंतर समजु लागले आपण आपली भाकरी नीट मिळवली तर ती मागे राहिलेल्या साठी मिळवण्याास हातभार लावू परंतू या लढाईत कष्ट हे करीत असताना मन कुरतडत होते. कुरतडणार्या मनातला समजावून उभा राहिलो. स्वत: स्थीर होताच समाज कार्यासाठी मन ओड घेत होते.
![]()
महाराष्ट्राच्या जडण घडणीत देशाच्या सामाजीक, सांस्कृतीक विकासाचा दिशा दर्शक म्हणुन वर्धा जिल्हा ओळखला जातो ही ठेवण आज ही जपली जाते. या जिल्ह्याने माणुस घडवीण्याची प्रक्रिया सुरू केली. एक कष्टकरी घर एक शेतकरी घर, एक पैलवान घर आशा समान्य घरातील श्री. रामदास तडस कृषी उत्पन्न बाजार समीतीचे एक सदस्य म्हणुन राजकीय क्षेत्रात उमेदवारी सुरू करतात व आज वर्धा मतदार संघाचे खासदार म्हणुन निवडून जातात.