कसबेडिग्रज : शासनाकडून ओबीसीचे आरक्षण रद्द केले आहे. आता ते फक्त निवडणुकीपुरते मर्यादित असले तरी यापुढे सर्व क्षेत्रातील आरक्षण रद्द होण्याची चिन्हे आहेत. तेव्हा असंघटित लोकांवर अन्याय होईल. यापुढे ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे महत्त्वाचे आहे, म्हणूनच संघटित लोकच यापुढे सुलभ पद्धतीने जीवन जगतील, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केले.
जालना,२१ डिसेंबर समाज जोडो अभियान अंतर्गत सुदुंबरे येथून निघालेले श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे जालन्यात जंगी स्वागत सकल तेली समाजाच्या वतीने करण्यात आले. या रॅलीदरम्यान चिमुकले आबालवृद्ध व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या रॅलीदरम्यान भजन टाळ मृदुंग पावलांच्या सुरात तसेच महिलांनी फुाडी खेळून व फेटे परिधान करून आनंद घेतला यावेळी रथयात्रा सोबत तेली समाजाचे
औरंगाबाद संताजी जगनाडे महाराज यांची हस्तलिखित गाथा, पादुका व मूर्ती ठेवलेली रथयात्रा मंगळवारी (२१ डिसेंबर) शहरात दाखल झाली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे समाज जोडो रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे येथून निघालेली यात्रा राज्यभर जनजागृती करीत आहे.
नगर - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक सभेच्यावतीने ओबीसींवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. जातीमधील सर्व पोटजाती विसरुन तेली समाजासह ओबीसी समाज संघटन मजबूत व्हावे हे काळानुरुप गरजेचे आहे. प्रांतिक तैलिक महासभेच्या तेली समाजाच्या अॅपद्वारे समाजाची महाराष्ट्रभर जनगणना व्हावी व समाजाचा डाटा गोळा करणे गरजेचे आहे. तसेच ओबीसींवरील होणार्या अन्यायाबाबत वेळप्रसंगी समाज रस्त्यावर उतरेल.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक (तेली) हा सभेच्यावतीने श्री संताजी जगनाडे महाराज याच्या जंयतीचे औचित्य ८ डिसेंबर पासून राज्यात समाज जोडो रथयात्रा अभियान सुरु करण्यात आले आहे. रथयात्रेचे सोलापूरमध्ये आगमन होताच स्वागत व पूजन सोलापूर जिल्हा तैलिक महासभेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अविनाश मार्तड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशाल मार्तडे, शहराध्यक्ष अशोक कलशेट्टी,