Sant Santaji Maharaj Jagnade
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (4)
आपण आपल्या सह समाजाला ओबीसी संघर्षात आना तेंव्हा ते म्हणाले ओबीसीत दम नाही आता मला सांगा ४४ टक्के मधे तेली १० ते १२ टक्के मग या बहुसंख्य समाजाचे नेते जर संघर्षाच्या रस्त्यावरून पळुन जात असतील समाज पातळीवरील चिंतन शिबीरात संघर्षाची गर्जना देत असतील तर समाजाला या भूताबरोबर किती लढावयास लावणार. हा प्रश्न या ठिकाणाी उभ रहातो. कारण हे हाय कमांड जे बोलते तेच वाक्य जेंव्हा त्यांनी नेमलेले पदाधीकारी आगदी तसेच बोलतात तेंव्हा खर्या संघर्षा पासून समाज किती दूर आहे हे समोर येते.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (3)
मी २००९ साली मराठे आपले भाऊ आहेत का ? या नावाचे पुस्तक लेखन करून प्रसिद्ध केले. २०१३ साली खर्या ओबीसींवर होणारा अन्याय हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुणे येथे ओबीसी तर्फे आरक्षण बचाव अभियानांतर्गत जो मोर्चा २०-११-२०१३ काढला त्यात सुकाणा समितीचा प्रमुख होतो. मराठ्यांच्या ओबीसीतील घुसखोरी बाबत ऑगष्ट २०१३ मध्ये पुण्यात अभियान संपन्न केले. हजारो ओबीसींच्या जाहिर परिषदा महाराष्ट्रात घेतल्या. म्हणुन अधीकाराने सांगू शकतो. समाज पातळीवर फड गाजवणारी फडकरी मंडळी तेंव्हा कोठे होती ?
ओबीसीच्या टक्केवारीत वाढ होणारा आणि तो समाज शिक्षण, नोकरी, सत्ता या सर्वांमध्ये वाटा मागणार या सर्व कारणांमुळे ओ.बी.सी. ची जातीनिहाय जनगणनला होउ दिली जात नाही. असे मत श्री. रमेश भोज अध्यक्ष पुणे ओबीसी सेवा संघ, पुणे जिल्हा दि. २६/०६/२०१५ रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
पुणे :- श्री. प्रदिप ढोबळे अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांच्या मार्गदर्शनातुन ओबीसी समाजाचा इतिहास, शासकीय आदेश, समस्या यांचा वेध घेणारी www.ObcSevaSangh.com वेबसाईट सुरू करण्यात आली सदर वेबसाईटचे उद्घाटन माजी नायब तहसिलदार श्री. बाळासोा अंबिके, उपाध्यक्ष ओबीसी महासभा महाराष्ट्र यांच्या हास्ते झाले.
आपले सत्तेसाठी विकलेले नेते. हे आपल्या आरक्षणाला धोके ठरले आहेत. हे जसे सत्य आहे. तेवढेच महाराष्ट्राच्या स्थापने पासून सत्तेत व विरोधात हाच मराठा समाज आहे. फुले, शाहू, अंबेडकरांचे नाव सांगून त्यांची समता, स्वातंत्र्य व त्याग आज मलिन केला गेला आहे. प्रथम जाती पाहून तिकीट वाटप व सामदाम, दंड फोडा व झोडा आशा तंत्रांचा वापर करून विजयाची घोडदौड. मते हवीत पण यांच्या विकासाचा मुद्दा येताच या मंडळीनी आपल्या हितासाठी खेडोपाड्यातील गरिब मराठा व ओबीसी यांच्या मध्ये कलगी तुरा आसा सामना लावून गरिब मराठ्यासाठी लढतो हे बुजगावणे उभे केले. ना यांना गरिब मराठ्यांचे प्रेम ना ओबीसी अस्था. कारण घटने नुसार आरक्षण देता येत नाही हे सिद्ध झालेच आहे. पण लढाई जुंपुन तोंडाला पाने पुसण्याचा हा सर्व प्रकार महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूकी दरम्यान सुरू आसतो. मराठा समाजातील काही राजकीय व्यक्ती आमदार खासदार होण्यसाठी मराठा हा मुद्दा घेऊन वाजवत ठेवतात. कारण याच बळावर मराठा सत्तेत जास्त येतो हे गणित मांडले जाते यासाठी ना. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली. कमिटी या देशाच्या संविधानाला बांधील नसते तर बांधील आसतो आयोग म्हणून आयोग कायदेशीर व कमिटी ही दांडगाई.