Sant Santaji Maharaj Jagnade
औरंगाबाद, ता. 11 : अंमळनेर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या फलकावर चिखलफेक करणार्या व्यक्तीना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी तेली युवा संघटनेतर्फे क्रांती चौक येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
राजगुरू नगर :- श्री. संत संताजी महाराज ट्रस्ट राजगुरू नगर तर्फे तेली समाज वधु-वर मेळावा आयोजित केला होता. यावेळी श्री. जनार्दन जगनाडे अध्यक्ष सुदूंबरे संस्था बोलत होते. ते पुढे म्हणाले ग्रामीण भागातील या आयोजकांनी गेली 2/3 महिने कष्ट घेतले. या कष्टातुन हा क्षण आला आहे. यातुन अनेकांच्या घरात जावाई येणार आहे. सुन येणार आहे. याचे श्रेय या अयोजकांना जाते. या साठी सर्वश्री नामदेव कहाणे, दिलीप खोंड, खळदकर, गणेश कहाणे, अविनाश कहाणे व त्यांच्या टिमने कष्ट घेतले आहेत. या मंडळींनी समविचार एकत्र ठेऊन गत 2 वर्ष विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमातुन विद्यार्थी गुण गौरव , हळदी कुंकू या माध्यमातून त्यांनी समाज संघटन सुरू ठेवले आह. वधु वर मेळावे सामुदाईक विवाह ही गरज जरूर आहे आपल्यतील विविध संस्था आजी - माजी आमदार नेते हा उपक्रम राबविलाल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत आता या मेळाव्यातील उपक्रमातुन आपण सामाजीक जाणीव ठेऊन या साठी 1) विद्यार्थी दत्तक योजना 2) संताजी महाराज मंदिर पिरसर विकास 3) सामुदाईक विवाह सोहळे सुरू करावेत अवघे धरून सुपंथ या भावानेन वाटचाल व समाजाचे अशीर्वाद मिळावेत यातच आनंद आहे.
श्री. संताजी प्रतिष्ठान नगररोड पुणे - 14 यांचे तर्फे दिनांक 28-08/2016 रोजी सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत अनुसया सांस्कृतीक भवन, साई मंदिराशेजारी, साई नगरीनगररोड, पुणे 14 येि 10 वी / 12 वी पदवीधर मधील 70 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यर्थ्यांचा गुणगौरव व पालकांचा सत्कार करण्यात आला सत्काराचे स्वरूप विद्यार्थांना सन्मान चिन्ह व प्रशिस्ती पत्र तसेच पालाकांना श्रीफळ व गुलाब पुष्प असे होते.
घोडेगांव - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची आंबेगाव तालुका सहविचार सभा घोडेगांव येथे संपन्न झाली. यावेळी येथिल श्री. वासुदेव शिवाजी कर्पे यांची एकमताने तालुका अध्यक्ष पदी निवड झाली या वेळी सर्वश्री चंद्रकांत शेठ व्हावळ विभागीय अध्यक्ष श्री. मारूती फल्ले पुणे उत्तर जिल्हा अध्यक्ष, श्री. प्रदिप कर्पे सचिव प्रकाश गिधे कार्याध्यक्ष पुणे उत्तर उपस्थीत होते.
श्री. भगवान बागूल (पत्रकार), मालेगाव (नाशिक ) मो. 9823340409
समाजजीवनात व राष्ट्रजीवनात काही आदर्श हे एैतिहासिक व आदर्शवत असतात. अनेक पिढ्या त्यापासून प्रेरणा घेतात एवढेच नव्हे तर ते इतिहासाचे साक्षीदार असता. यातील ज्या व्यक्तिंमुळे हा इतिहास घडतो त्या व्यक्ती आदराचा विषय बनतात तेली समाजाच्या उत्कर्षासाठी झटणारी मुंबईची शनेश्वर फाऊंडेशन ही संस्था समाजआदरास विषय बनली आहे. त्या संस्थेच्या व्यक्ति म्हणजे तेल्यांचे बाबा आमटे बनले असे म्हंटले तर वावगे होऊ नये. असे काय आहे. या संस्थेच्या कार्याबाबत ? त्या कार्यापासुन तुम्ही आम्ही काय बोध घेणार ? प्रगतिच्या अनेकं योजने दुर असलेल्या तेली समाजाला अशा संस्थांचे कार्य दिशा देणारे ठरले. अशा अनेक संस्थांच्या उभारणीने प्रगत समाजाच्या समान पातळीवर नेण्यास मदत होईल.