लेखक: अर्जुनराव भगत (बुर्हाणनगर), श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
१) क्षेत्र वर्णन - बुर्हाणनगर हे अहमदनगर पासून सुमारे ५ किलोमिटर अंतरावर १००० लोकवस्तीचे लहानसे खेडेगाव आहे. ते अती प्राचीन असून नगर शहराच्या अगोदर लहानसे शहर होते. त्याठिकाणी १९१३ साली श्री. लहानु भिकु भगत (देवकर) यांनी स्वखर्चाने श्री तुळजापूर देवींचे भव्य मंदिर बांधले.
कै. सावळेराम गुंडीबा देवकर, देवकर घराण्यात प्रसिद्ध. त्यांना एकच मुलगी व तिला देखिल मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी वुईलपत्र केले की, तेली समाजास माझ्या मुलींच्या निधनानंतर ती जागा समाजाने ताब्यात घ्यावी व त्या ठिकाणी मंदिर बांधावे.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
डॉ. खैरनार गेल्या 20 वर्षापासून जामखेड येथे खाजगी वैद्यकीय व्ययसाय करीत आहेत. तसेच समाजाच्या इतर कामातही सहकार्य करीत आहे. जामखेड येथे तेल उत्पादक सहकारी सोसायटी निर्माण केली होती. ती तोट्यामुळे हल्लीबंद आहे.
मी एक पन्हाळे, पुण्याच्या अंबेगावातून धडपडत पुण्याच्या शिवेतून आलेल्या. त्यांच्या जवळ होती फक्त निमगावच्या खंडोबाचा आशिर्वादाची शिदोरी. माझ्या पूर्वजांनी या पुण्यात येऊन आपले नशीब घडविले. पणजोबांनी बरोबर शुन्य आणले होते. पुणे लष्कर मधुन त्यांनी जुने फर्नीचर विकत घेऊन किरकोळ दुरूस्ती करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. लोखंडी भंगार व हातगाडी ओढली व जुने फर्नीचर ही घेत असत.
ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो असे विचारवंतानी म्हटले आहे. अशाच ध्येयातून काही माणसे आपली वाटचाल करतात. खंडाळा , ता. वैजापूर सारख्या ग्रामीण भागात एका शेतकरी कुंटूबात कचरू वेळंजकर यांचा १० जुन १९६७ रोजी जन्म झाला. शेतीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुंटूंबात जन्माला आल्याने बालपणापासुनच वेदना, दुःख, सामाजिक भान ह्या जाणिवा निर्माण झाल्या.