औरंगाबाद - जगतगुरू तुकाराम महाराज यांचे गाथा लेखक व तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराज यांची पुण्यथिती समाजबांधवानी घरोघरी साजरी करावी. जेणेकरून एकोपा निर्माण होऊन आपलेपणेची भावना निर्माण होईल. न्यू जयश्री अँडव्हर्टायझिंग एजन्सीचे संचालक राजेंद्र होळीवाले यांच्या ठाकरे नगर N-2 सिडको येथील निवास्थानी अभिवादन सभेचे आयोजन होते.
पैठण दि 24 डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण येथे संताजी महाराज मंदिरात संताजी महाराज पुण्यतिथी ऊत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पैठण तालुक्याचे आमदार संदीपान पा भुमरे याचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद चे सभापती श्री विलास बापु भुमरे व सदस्य कापसे पाटील व नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक भुषण कावसानकर, ईश्वर दगडे, नगर आबासेठ बरकसे,संस्थेचे अध्यक्ष विक्रमसेठ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव बरकसे, सचिव भगवान मिटकर
संत तुकाराम महाराजांची गाथा लिखाणातून तारून जगासमोर आणणारे, यांचा १७ वर्षे सहवास लाभलेले आपल्या समाजाचे पण सर्वांसाठी प्रेरणा असलेले श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. अखंड हरिनाम सप्ताहची सांगता रविवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते १२.०० वा.
परिस्थितीवर मात करून नेहमी आनंदी रहावे - लक्ष्मीताई महाकाळ
औरंगाबाद, प्रतिनिधी, - जीवन जगतांना अनेक अडचणी संकटे येतात पण खचून न जाता संकटाला धैर्याने समोर जाऊन संकटांवर मात करावी. तेली समाज सेवक श्री महेंद्र महाकाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी त्या बोलत होत्या पुढे बोलतांना त्या म्हणाल्या माणुस छोटा मोठा असे काही नसते जो तो आप आपल्या क्षमतेने परिपूर्ण असतो. तुमच्याकडे किती पैसा किती प्रॉपर्टी आहे याचे कोणाला काही देणे घेणे नसते.
औरंगाबाद,(प्रतिनिधी) - अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कॅबिनेट मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांच्या व कोषाध्यक्ष कृष्णरावजी हिंगणकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी यांनी यांनी गणेश पवार यांची निवड केली.गणेश पवार यांनी औरंगाबाद शहरात विविध सामाजिक कार्यक्रम यशस्वी करून समाज संघटनेचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.