दि.6/10/2019 रोजी तेली सेनेच्या वतीने औरंगाबाद येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.आपले तेली समाज बांधव श्री.गणेश शिंदे,व सौ.अल्काताई शिंदे यांनी सकल तेली समाज नारी शक्ती नवरात्र उत्सव समिती स्थापन करून दर्गामातेची प्राणप्रतिष्ठा केली होती,त्या दिवशी अष्टमीची पूजा असल्या मुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकल्या नव्हत्या त्यामुळे आज कु. साक्षी गणेश शिंदे हिला तेली समाजाचे जेष्ठ नेते विश्वनाथ गवळी (मामा) यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद,(संभाजीनगर) दि.6/10/2019 रोजी औरंगाबाद येथे तेली समाज गुणवंत विघार्थी सत्कार समारंभ व तेली समाज कर्तबगार पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून तेली समाजाच्या महिलांना सामाजीक कार्याची ऊर्जा दिल्या बद्दल गणेश पवार सुनिता पवार,यांचा त्यांच्या शुभ चिंतकांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.या वेळी गणेश पवार हे बोलत होते,पुढे बोलतांना ते म्हणाले की कोणत्याही चांगल्या कामाला समाज पाठबळ देत असतो.
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व तेली समाज कर्तबगार महिला पुरस्कार वितरण सोहळा - दि. 6/10/2019 (रविवार) रोजी
औरंगाबाद,प्रतिनिधी,प्रतीवर्षी प्रमाणे याहीवर्षी कॅबिनेट मंत्री आदरणीय,जयदत्त (आण्णा) क्षीरसागर,विधानसभा अध्यक्ष श्री.हरीभाऊ बागडे (नाना) उघोगमंत्री श्री.अतुल सावे,वैधानीक मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षः श्री.भागवत कराड,शिवसेना नेते श्री.चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार श्री.अंबादास दानवे,प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा, श्री.अनिलभैय्या मकरिये, भारतीय जनता पार्टी,ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव तथा नगर सेवक जालना,श्री.अशोक (आण्णा) पांगरकर,जिल्हा परिषद सदस्य श्री.सुरेश सोनवणे सर, तसेच औरंगाबाद तेली समाज
औरंगाबादला, प्रतिनिधी, औरंगाबाद येथील तेली समाजाचे नेते अनिल मकरिये यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आज उघोग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या कडे तेली सेना, तेली समाजाच्या वतीने करण्यात आली.अतुल सावे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद मध्य मतदार संघात तेली समाजाचे 75 हजार कुटुंबे आहे. तेली मतदार लक्षणीय आहे. हा समाज नेहमी भारतीय जनता पक्षा सोबत राहत आलेला आहे.
परळी वैजनाथ तेली समाज श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकतेच परित्रक काढले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.