Sant Santaji Maharaj Jagnade सर्व समाजबांधवांना कळविण्यात येते की, श्री संताजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील समाजातील सर्व पदवीधर व प्रोफेशनल व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व समाजबांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या कुटुंबातील डॉक्टर, वकील, इंजिनीअर, पोलीस खात्यातील, शासकीय अधिकारी इतर क्षेत्रातील उच्च पदावर नुकतीच नियुक्ती झालेल्यांची माहिती खालील मोबाईल क्रमांकांवर पाठवावी, त्यांचा उचित सन्मान आम्ही करू इच्छितो.
श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 3)
![]()
पुण्याच्या कस्तुरी चौकाला इतिहास आहे. या चौकातच बराच लांब पसरलेला भगतांचा वाडा. या वाड्यातले रत्नाकर उर्फ दादा भगत म्हणुन परिचित साने गुरूजींच्या चळवळीत वाढलेले. सामाजिक कार्याची आवड व धडपड असलेले. सुदुंबर्याच्या उत्सवात हिररीने पुढाकार घेणारे. घराजवळच्या विठोबाच्या मंदिराची सेवा करणारे असे श्रद्धावान गृहस्थ. त्यांच्याच पूर्वजांनी जंगली महाराज मठ उभारण्यात पुढाकार घेतलेला.
श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 2)
![]()
श्री. धोंडीबा राऊत हे एक माळकरी व टाळकरी. शिक्षण जेमतेम झालेले जेमतेम शिक्षणावर पगार देणारी पोष्टमनची नोकरी करीत. तळेगाव दाभाडे ते चाकण रस्त्यावर इंदोरी हे बर्यापैकी गाव. या गावच्या बाजारपेठेत छोटेखानी घर सुदुंबर्याच्या काळे घराण्यातील त्यांची आजी व भक्ती करावयाची वंशपरागत तोच धागा त्यांच्याकडे आलेला.
पुणे :- ज्येष्ठ साहित्यिक अँड. सहदेव मखामले यांना महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि गिरीषभाऊ महाजन यांचे हस्ते अखिल-भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचा २०१४/१५ चा सानेगुरूजी साहित्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
![]()
एकनाथाच्या हाती ज्ञानेश्वरी पडण्यापुर्वी तो भागवताच्या एकादशस्कंदावर स्वत: लिहिलेल्या टीकेचे व भावार्थरामायणाचे पुराण सांगत असे. त्याच्या पुराणास येणार्या मंडळीत एक तेली होता. त्याने एक दिवशी ज्ञानेश्वरीची जुनी पोथी एकनाथाकडे आणली आणि म्हणाला. ’महाराज, ही एक पोथी माझ्या घरात फार दिवस पडली आहे, हिचा आपल्यास काही उपयोग झाल्यास पहा. ब्रह्मज्ञानाने ओतप्रोत भरलेला तो ग्रंथ पाहून एकनाथास फारच आनंद झाला. पुसत आलेल्या त्या ग्रंथाचा जीर्णोद्धार करण्याच्या हेतूने एकनाथाने त्याची एक नवीन प्रत तयार केली. पण या नव्या प्रतीतत्याने मनास वाटेल तसा फेरफार केला ! नंतर लवकरच त्याने स्वरचित ग्रंथास फाटा देऊन, ज्ञानेश्वरीचेच पुरण सांगण्यास प्रारंभ केला.