Sant Santaji Maharaj Jagnade ![]()
- मोहन देशमाने, ओबीसी सेवा संघ
आर्यांच्या पुर्वी देशात मातृसत्ता कुटूंब पद्धत होती. त्याचे प्रतिक म्हणुन आजही देवी पुजली जाते. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणुन भवानी माता आहे. तीचा शोध हा सिन्नर येथे राज्य करणार्या यादवा पासून सुरू होतो. सिन्नर, जुन्नर हे जवळ होते. आणी या वेळी तेली मंडळी येथून आपला पलंग भवानी मातेला घेऊन जात असावेत किंवा या समाजाला देवीचे सेवेकेरी म्हणून मान असावा. ती परंपरा आज ही घोडेंगावातून सुरू आहे. घोडनदीच्या काठावर वसलेले घोडेगाव. या गावचे चिलेकर, त्याही पुर्वी इतिहास सागतो आगदी शिवकाळात पुणे परीसरातील तेली बांधव आपला व्यवसाय संभाळून हातावर भाकरी घेऊन प्रसंगी स्वराज्यासाठी लढत पुण्याच्या पंचक्रोशीत तेली समाज आपली हुकमत ठेवून होता.
![]()
खरे तर वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शोष्णाच्या विरूद्ध एल्गार म्हणून होती. मनुवादी संस्कुतीची जोखडे तोडण्यास्तव केलेला प्रबोधनस्वरूपी किर्तनाचा जागर होता. धर्ममार्तंडांच्या जोखडातून भेाळया भाबडया अज्ञानी निरक्षर पिडलेल्या रयतेला मुक्तकरण्यासाठी चालविलेले ते मानवमुक्तीचे शांत व संयमी असे आंदोलन होते.याच वारकरी संप्रदायातील सूर्य म्हणून संताजी जगनाडे महाराजांचे नाव येते. एक क्रातीकारी पाऊल उचलणारे लढवय्येे योदधे म्हणून त्यांचे नाव शिल्पात कोरावयास हवे आहे.
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 3) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
वरिल तीन नावे वाचल्या नंतर जरा वेगळेच वाटले असणार. हे तिघे ही एकाच काळातील. मी तेली आहे. माझे पुर्वज तेली होते. माझ्या नंतरचा वशंज तेली असणार आहे. त्यामुळे या व्यवस्थे विरोधात मी लढणार आणी मी लढून या व्यवस्थेला संपवणार ही ध्येय संताजींची होती. आणि म्हणून त्यांनी ब्राम्हण धर्मानुसार किंवा ब्राम्हण कायद्याप्रमाणे व मुसलीम सत्तेत अधीकार पदावर राहून संत तुकारामांना शिक्षा दिली. या शिक्षेला अपील नव्हती. या शिक्षेला मुसलीम सत्ता ढवळा ढवळ करीत नव्हती तर ब्राह्मणी सरदारांना उलट संरक्षण देत होती. आशा वेळी हा ब्राह्मणी कायदा मोडायचा ठरवला तो प्रथम इतिहासात संत संताजींनी.
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 1) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
आपल्या प्रेरणा स्थाना विषयी. आपल्या तेजा विषयी, आपल्या ताकदी विषयी आपल्या शक्ती विषयी जेंव्हा पुर्ण माहिती आसते तेंव्हा आपल्या त्या आदर्श व्यक्ती विषयी जागृत आसतो आणी ही जागृती आपल्याला आपल्या व्यक्तीच्या विचार धारेच्या प्रवाहात नेहते. आपण त्या व्यक्तीच्या कार्यापर्यंत घेऊन जातो आणी ती जर बोथट असेल चुकीची ही असेल तर त्या महामानवाच्या वैचारीक ठेवणीला आपन दफन करून फक्त त्यांच्या नावावर दुसर्यांने जे खपवले त्याचे डावपेच न ओळखता आपन फक्त भार वहाणारे ठरतो. हा भार त्या व्यक्तीच्या नावेे आसतो पण आत जे आसते ते त्या व्यक्तींच्या नावे नसतो या नंतर असा काळ येतो की आपन भक्त बनतो. आणी त्या व्यक्तीला कुटील डावात संपवणार्यांचे पोवाडे गातो. वस्तुस्थीती अशी असते की एकदा का आपन भक्त बनलो की पुजनातच गुंग होतो.
![]()
आम्ही घडलो खासदार रामदास तडस साहेबा मुळे - चंद्रकांत वाव्हळ, पुणे विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा
वृत्तीने पैलवान एक खेळाडू तिन विदर्भ केसरी पद मिळवलेले खेळ हा पिंड जोपासलेला. या तांबड्या मातीत शिकले यश मिळवता येते पण पहिले अपयश मिळवले पाहिजे. हे अपयश पचवता आले पाहिजे या अपयशातुन बरेच शिकता आले पाहिजे. यश हवे असेल तर या जोडीला आपल्या माणसाचा विश्वास ही शिदोरी मिळवता आली पाहिजे. ती मिळवली खा. तडस साहेबांनी त्यांच्या वाटचाली कडे पाहिले तर एक ठळक गोष्ट नजरे आड करता येत नाही मुळात तडस हे घराणे यवतमाळ मधील खेडगावातील या खेडेगावात त्यांच्या वडीलाकडे शेती होती.