Sant Santaji Maharaj Jagnade
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 5) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
समता, स्वातंत्र्य यांचा बौद्ध काळ संपवल्या नंतर ब्राह्मण्यचे राज्य सुरू झाले. यादवांच्या काळात तर नावाला राजे यादव पण कारभार हेमाडपंत हे ब्राह्मण हाकत होते. ही जुलमी सत्ता नष्ट होताच मोंगल सत्ता आली. तीला उतरती कळा येताच पेशवाई आली. पेशवाई जाताच इंग्रजी सत्ता आली. इंग्रज जाताच काँग्रस आली. काँग्रेस जाताच भााजपा आली. नुसती सत्ता बदलली म्हणजे स्वातंत्र्य का ? आज विकासाचा पैसा आपल्या साठी येतो का ? घरातला मुलगा हुशार असुन उपयोग नाही तर की पैसे देतो यावर प्रवेश आसतो. मंडलने राखीव जागा दिल्या. त्या माराठ्यांनी मनगट व पैसा या बळावर पळवल्या. स्वातंत्र्या पसुन किमान शंभर ही आमदार समाजाचे होऊ शकले नाहीत फक्त दहा टक्के लोकसंख्येच नुसतेच बेसुर उमटत रहातात.
उमेदीच्या काळात नगर शहरात आपला ठसा उमटवल्या नंतर ते व श्री. गोकूळ काळे हे श्री क्षेत्र सुदूंबरे संस्थेत पदाधीकारी म्हणून कार्यरथ झाले. संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ कामकाज पाहिले. याच दरम्यान कै. केशरकाकु क्षिरसागर यांचा संबंध आला. महाराष्ट्रात प्रथम नगर शहरात त्या खासदार होताच जंगी सत्कार केला. केशरकाकु महाराष्ट्र तेली महासभेच्या अध्यक्षा होत्या. विदर्भात रूजलेली ही संघटना मराठवाड्यात नावा पुरती होती. पण हीच संघटना उरलेल्या महाराष्ट्रात नावा पुरती ही नव्हती. अहमदनगर शहरात देशपातळीवरील मिटींग 1994 च्या दरम्यान आयोजित करण्यात कै. प्रकाशशेठ यांनी पुढाकार घेतला. याच जाहिर मिटींग मध्ये काकु देशपातळीवर अध्यक्षा झाल्या.
एका सरपंचाचा दिवसा ढवळ्या खुन. एका नगरसेवकाचा दिवसा खुन. या बाबत नेते म्हणुन घेणार्यांनी आज पर्यंत कुठे ब्र काढला नाही. प्रश्न स्थानिक आहे. मध्यंतरी मोदी यांची ही पडद्या मागुन जात रस्तयावर आणली होती. इकडे विरोधा पेक्षा अभिमानाने सांगतो मोदी तेली आहेत. या पुर्वी आठवले यांचे उदाहरण याच साठी दिले. त्यांचया धोरणा विषयी माझी काही मते जरूर आहेत. पण त्यांनी जे साध्य केले त्या विषयी मते नाहीत. नुसतीच भाटगीरी करून काय मिळवले ? आज ओबीसी आरक्षणा विषयी भागवतासह काही जन जे बोलतात आज न्याय पालिकेचे एक न्यायधीश मत मांडतात देशाला भ्रष्ट्राचार व आरक्षण ही किड आहे. ही बोलण्याची ताकद 12 टक्के तेली समाजाने दिली.
युवा प्रकोष्ठ साहू समाज छत्तीसगढ़ के तत्वावधान में आज दिन शनिवार को खुर्सीपार भिलाई के कर्मा माता मंदिर में सामाजिक भाई बंधुओं के द्वारा पूजा अर्चना का कार्यक्रम किया गया जिसमें प्रमुख रूप से छत्तीसगढ़ युवा प्रकोष्ट प्रदेश संगठन सचिव प्रेमकिशन साहू जी,प्रदेश युवा प्रकोष्ठ सयुक्त सचिव सूरज साहू जी संतोष साहू , रितेशजी, अंकुश साहू जी समीर साहू जी,कमलेश साहू जी
महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासाचा ठेका घेतलेली संघटना व या संघटनेचे हाय कमांड ते पदाधिकारी एका तालात एका सुरात नेहमी एकच गाणे वाजवतात. आम्ही बारा टक्के आहोत. आम्ही तुमचे बारा वाजवु शकतो. या गाण्यातील हे जे कडवे आहे. ते मात्र सत्य आहे. कारण या कडव्यात खरी ताकद आहे. पण जसे हे गाणे लांबत जाते तसे समाजाचा शेवटचा बांधव त्याच गाळात अधीक रुतु लागतो. तेंव्हा उरते फक्त कडवे आणी याचा गाभा हवेत विरला जातो.