संत तुकाराम श्रिमंत घरात जन्मले होते. दुष्काळ हा पैसे कमविणयाची महान संधी आसते. त्या संधीचे सोने करण्यापेक्षा त्यांनी आपली धान्याची कोठारे दुष्काळ ग्रस्तांना दिली. याही पुढे जाऊन तुकोबांनी नक्की काय करावयाचे याचे चिंतन करून आपल्या वाट्याला येणार्या सावकारी कागदपत्रे नदीत फेकुन कर्जदारांना कर्ज मुक्त केले. या दोन गोष्टी तुकोबा व संताजी एक होण्यास कारणीभुत ठरल्या आहेत.
संत तुकारामा सह संत संताजींनी जी सामाजीक, धार्मिक क्रांती केली. त्या क्रांतीच्या इतिहासाच्या पाना पानावर संताजींचे नाव कोरले आहे. वेद, स्मृती, श्रुती, पुराणे, मिताक्षरी या हिंदु धार्मीक धर्म ग्रंथांना ही लाज वाटेल इतके प्रबळ अभंग तुकोबांचे आहेत. ही वास्तवता अनेक विद्वान मान्य करतात. आणी या वरिल धर्मग्रंथांना ही फटकारताना असेच तुकोबाचे अभंग आहेत. हे लेखन फक्त तुकोबाचे आहे. हे काही बाबतीत मान्य आहे. काही बाबतीत या साठी की पंडीतांनी मोडीचे रूपांतर देवणागीरीत करीताना काही बदल ही केलेत.
होता संतु म्हणुन वाचला तुका, तुकोबांच्या चौदा टाळकर्या पैकी एक टाळकरी संत संताजी संत तुकोबा गाथा पालन कर्ते म्हणजे संत संताजी. मी सुद्धा वरिल समजत होतो. पण संत संताजी सर्व दिशांनी जेंव्हा समजुन घेऊ लागलो तेंव्हा मला संत संताजी वरिल पद्धतीने मांडणे हेच मुळात त्यांच्यावर फार मोठा अन्याय करण्या सारखे आहे. हे माझेच मला समजुन आले. संत संताजी पुर्ण समजले नाहीत पण जे समजले संभाळले व वाटले सुद्धा. त्या शब्दांच्या शस्त्राने पुढे शेकडो वर्ष माणसाला जगता येऊ लागले. पण ही संत संताजींनी संभाळलेली शस्त्रे आज आपणच त्यांना दुर लोटत आहोत. तेंव्हा पुन्हा एक वेळ संत संताजी समजुन घेऊ.
कै. भाऊंनी समाजातील काही गरीब विद्यार्थीना दत्तक घेऊन मदत केली. संस्थेची शिक्षण समीती सशक्त असेल तर मदत ही चांगली देता येते. हे विचार मांडून भाऊ थांबले नाहीत तर त्यांनी समिती प्रमुखा बरोबर महाराष्ट्रभर दौरे ही काढले. त्युळे बरीच वर्ष भविष्यात शिक्षण समीती गरिब विद्यार्थाना शैक्षणिक मदत देत होती. समाज म्हणजे भाऊ व भाऊ म्हणजे समाज असे समिकरण होते. वाई येथे समाजाची तेल उत्पादक सोसायटी ही सुरू केली होती. त्यामुळे तेल उत्पादन करणार्या बांधवांना मदतीचा हात देता आला समाजातील अनेक बांधवांना त्यांनी मार्गदर्शनाचा व सहकार्याचा हात दिला आहे त्यामुळे बरेच जन आपल्या आयुष्यात खंबीर उभे आहेत. तेली गल्ली (गावकूस) 1983 मध्ये सुरू करताना कै. भाऊंनी समाज समजुन दिला वाटचालीचे मार्गदर्शन ही केले.
या परिसराचे वैशिष्ठ असे की दोन्ही शाखेत एक समान दुवा आहे. या परिसरात जन्मा पासुन मरे पर्यंतु जे विधी होतात हे सर्व विधी ब्राह्मणा द्वारे नव्हे तर जंगम कडून आज ही होतो. ब्राह्मणाने केलेले विधी मान्य नाहीत. जेंव्हा हा या परिसरात तेल गाळप ही प्रक्रिया बैलघाण्याद्वारे होत होती. तेव्हा प्रत्येक सोमवारी घाणा बंद आसे. महादेव हाया परिसराचा सर्वश्रेष्ठ देव. यातुन एकस्पष्ट शैवपंथ वैष्णव सरळ सरळ भेद होते. या मध्ये हा परिसर शैव पंथ अभिमानाने संभाळत होता. भस्म हे त्याचे प्रतिक आज ही या परिसराची साठवण आहे.