भोसरी :- महाराष्ट्र तैलिक महसभेची सहविचार सभा येथे संपन्न झाली यावेळी महासभेचे महासचिव श्री. भुषण कर्डीले, कार्याध्यक्ष, श्री. गजानन शेलार उपास्थीत होते. बरेच महिने रिक्त असलेल्या पुणे विभाग पदासाठी उपस्थीत आसलेल्या सर्व समाज बांधवाना विचारणा केल्या नंतर बहुमताने श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ यांची अध्यक्ष पदी निवड केली. डोंगर दर्यात विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्रीत करून त्यांनी महाराष्ट्रात कुणाला जमले नाही अशी परिचय पुस्तीक वधुवर मेळावे व इतर समाज उपयोगी काम केल्या मुळे त्यांची या पदावर निवड झाली. त्यांच्याशी सपर्क साधला आसता ते म्हणाले या विभागातील काही परीसरात खाने सुमारी झाली आहे.
तेंव्हा त्यांनी आपल्या राजेंद्र या मुलाला जामगाव, ता. पारनेर इथे त्याच्या मामाकडे शाळे साठी पाठवले. या खेड गावात इ. 5 वी ते इ. 10 वी पर्यंत शिक्षण घेत होते. शिक्षण पुर्ण होताच पुढे काय हा घरात प्रश्न होताच बारामतीच्या मंडईत किंवा आजुबाजूच्या गावात जावुन बाजार करावा उत्पन्न ही तोकडे भांडवलही तोकडे ही कसरत एक वर्ष तरी ही करावी लागली. बारामतीतच श्री. हरीभाऊ पोटे काका होते. यांच्याकडे सन 1980 मध्ये कामाला लागले. पगार तरी किती फक्त 90 रुपये . हे 90 रुपये घराला गरजेचे होते. इथे तेल उत्पादनाचे नवे तंत्र समजुन घेता आले.
कै. जयप्रकाश किर्वे श्रद्धाळु होते. सामाजीक जाणीवेचे होते. त्यातुन वावरत होते. श्री. संभाजींनी तोच विचाराचा धागा पुढे चालविला. शनी मंदिराच्या जीर्णोद्धारात ते आघडीवर होते. बारामतीची साठवण तेली पंच मारूती मंदिर या मंदिराचे सलग 5 वर्षे ट्रस्टी होत. त्यांनी या साठवण असलेल्या संस्थेचे उपाध्यक्ष पद ही विश्वासाने संभाळलेले आहे. याच बारामती येथे श्री. संताजी महाराजांचा जन्म उत्सव यशस्वी पणे पार पाडला आहे.
लोकशाहीत आपण राजकारणा पासुन दूर राहू शकत नाही. लोकशाहीत आपण समाज कारणा पासुन दुर राहू शकत नाही याच मुळे श्री. सुरेश पितळे व सुभाष गर्जे यांचा संबंध आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात संबंध येऊ लागले. सत्ता स्थान व समाजसेवा याची ओळख झाली. यातुनच भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, मा. पंतप्रधान चंद्रशेखर, माजी उपप्रधान यशवतंराव चव्हाण, जाणता राजा मा. शरद पवार यांच्या संपर्कात ते अनेक वेळा आले.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
या देशाच्या मुख्य प्रवाहात 85 टक्के मागासवर्ग यावा या साठी केंद्र शासनाने नचिअप्पन रिपोर्ट शासनाला सादर केला. परंतु हा रिपोर्ट सर्व पक्षीय असलेल्या क्षत्रिय व ब्राह्मण जातींनी गुंडाळुन ठेवण्यात देशप्रेम मानले आहे. हा रिपोर्ट काय आहे याची साधी तोंड ओळख सुद्धा देत नाहीत. काँग्रेस प्रणीत व भाजपा शासनाने या विषयी तोंडावर बोट व हाताची घडी ठेवली आहे. कारण हा रिपोर्ट म्हणजे हा खरा लोकशाहीचा गाभा आहे.