सातारा जिल्ह्यातील सायगांव एक छोटे गाव. तेलघाना ही या बाधवांची परंपरा तेल घाण्याला मावळत बाजु होती. तो घाणा ही मावळु लागला भुसार माल खरेदी विक्री मुळ धरता धरता कोमजु लागली. आणि जगण्याच्या धडपडी साठी काही जन गाव सोडु लागले. त्या पैकी श्री. बी. पी देशमाने हे शासकीय नोकरी निमित्त बाहेर पडले.
शिरवळ या मुळ गावातुन ते लोणी कळभोर येथे स्थिर झाले. फिलिफ्स कंपनीत नोकरी करु लागले. तसा यांचा पिंड चळवळी स्वभाव धाडसी त्यामुुळे ते फिलिफ्स कामगार संघटनेचे अध्यक्ष झाले. कामगार हा त्यांचा पिंड जवळून पहाता आला. या कंपनीत अनेक समाज बांधवांना त्यांनी कामास लावले होते. कामगारांच्या हिता साठी त्यांनी संप पुकारला. संप लांबत चालला होता व्यवस्थापन मागण्या मंजुर करेणा.
या समाजाचा तेल बिया गाळप हा परंपरेचा व्यवसाय. तेल बी खरेदी गाळप उत्पादक माल विक्री. व्यवस्था तशी व्यापारी वृत्तीची या समाजात असे ही काही बांधव होऊन गेल की त्यांनी पिड्यान पिड्या मोठा व्यवसाय करणार्या किंवा व्यवसायाचे शंभर टक्के आरक्षण असलेल्या व्यपार्यांनाही मागे सारले. ही किमया कोरेगाव येथिल कै. काशिनाथ तुकाराम विरकर यांना साध्य झालेली होती.
सोमेश्वर नगर येथिल महाविद्यालयात तेलघाना अडगळीत गेला म्हणुन विठ्ठल पांडूरंग वाईकर यांनी शिपायाची नोकरी स्विकारली त्यांना एकुण 6 मुल. या मुलांचा संभाळत या नोकरीवर करीत. घरी येऊन गावात केरासीन विकत. या विक्री साठी घरातील सर्व सहकार्य करीत. मोठ्या चिरंजीवानी रॉकेल विक्रीला चांगले रुप दिले. प्रचलीत असलेल्या शासकीय नेमांचा आधार घेऊन ते व्यवासाय करीत होते. त्यामुळे तेल व्यवसायाशी जवळचा संबध आला. सातारा येथील दिपक प्रल्हाद इंगळे यांचा संबंध होता. त्यांचा फलटण जवळ बरड येथे पेट्रोल पंप होता.
क्षणभर मागे पहिले तर जवळ काहीच नवहते कै. रामचंद्र भोज हे बरोबर विश्वास व धडपड घेऊन आले. आणी स्वकष्टावर भोज कुटूंबानी गरूड भरारी घेतली श्री. विजय भोज हे सामाजीक जाणीव असलेले बांधव पुर्वी 82 भवानी पेठ या समाज संसथेशी उपनगरे संलग्न नव्हती. आशा वेळी स्थानीक प्रश्न सोडविण्यासाठी कोथरूड येथे संताजी प्रतिष्ठान उभे राहू लागले श्री. भोज यात सामील झाले. वधुवर मेळावा स्नेहमेळावे संस्थेचे विविध उपक्रम यशस्वी करण्यात सहभाग. आज या संस्थेचे एक जबाबदार घटक म्हणून कार्यरथ आहेत पाटणहुन या मातीत उभे राहुन झेप घेणार्या भोज कुटूंबीयांना हार्दिक शुभेच्छा.