श्री. विजय रत्नपारखी, विभागीय अध्यक्ष, प्रांतिक तेली समाज महासभा
राजकारणामध्ये इतर लॉबीमुळे किती सर्ंघष करावा लागतो, ते नेहमी सांगत आसतात. पण त्यांनी या लॉबीशी लढा देऊन आपले कार्य सिद्ध करून दाखविले. समाजासाठी काहीतरी करावे, समाजातील तरूण पिढीला नेहमी संदेश देतात, की तरूणांनो, संघटित व्हा, चांगले शिक्षण घ्या. चांगल्या हुद्यावर नोकरी करा. व्यवसाय करा. कोणीही मागे पडू नये. असे नेहमीच ते मार्गर्दशन करतात समाजासाठी तळमळ असणारे तडस साहेब नेहमी आमच्यासारख्या तरूणांना मार्गदर्शन करत असतात. समाजानेही अशा आपल्या नेत्यांना साथ द्यावी., त्यामुळे समाजाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. तडस साहेब कधीही समाजातील व्यक्तींचा भेदभाव करत नाहीत. सर्वांशी ते अगदी सलोख्याने विचारपूस करून त्यांच्याशी आपले नाते घट्ट करीत आहेत.
राजश्री भगत, अध्यक्षा अखील भारतीय म. प्र. व अल्पबचत महासंघ
तुका आभाळा ऐवढा वर्धा जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यातुन आमच्या समाजाचा माणुस दिल्लीच्या तख्तावर खासदार म्हणुन विराजमान झाल्याचा संपुर्ण समाजाला अभिमान आहे. त्याच्या उज्वल भवितव्यसाठी व दिर्घायुष्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते. व अखिल भारतीय महिला प्रधान व अल्पगचत प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण भारतातील ५ लक्ष अल्पबचत एजंटातर्फे त्यांचं अभिष्ठ चिंतन करते.
- प्रकाश कर्डीले, मा. अध्यक्ष, तिळवण तेली समाज पुणे.
समाज उभा आसतो संघटनेवर संघटना आसते कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यकर्ते आसतात नेत्याच्या नेतृत्वावर जर समाज संघटीत हवा असेल तर कार्यकर्ते हवे असतात. या कार्यकर्त्यांना संघटीत करणारा व ठेवणारा नेता तेवढाच खंबीर असावा लागतो. याचा जीवंत अनुभव म्हणजे खासदार रामदासजी तडस साहेब आहेत. अहमदनगर येथे अध्यक्ष पदाची जबाबदारी येताच ते आपल्या पदाला न्याय देऊ लागले.
समाजाच्या मतावर धनदांडगे व जातदांडगे मोठे होतात ते निवडणूकी नंतर समाज हिताचा निर्णय घेत नाहीत. उलट समाजाला मत भेदात ठेवून गुंतवत ठेवतात ही खरी आपल्या मागासलेपणाची पाळेमुळे. ही नष्ट करण्याचा विडा तडस साहेबांनी उचलला देवळी नगर पालीकेचे नगर सेवक नगराध्यक्ष १२ वर्षे आमदार व आज खासदार ही वाट त्यांनी निर्माण केली. होय मी तेली आहे. आणि मी तेली म्हणुन निवडणुक रिंगणात आहे मी जिंकणार ते तेली म्हणुन मी झटणारा तेली समाजासाठी ही जिद्द त्यांनी निर्माण केली. ही जिद्द त्यांनी आम्हा सर्वांना दिली.
-: भगवान मिटकर, सचिव म. तेली महासभा औरंगाबाद विभाग
श्री. संत संताजी तिळवण तेली समाज ट्रस्ट ही संस्था पुर्ण मराठवाठ्याची अस्मीता ही गौरवशाली परंपरा विस्तारीत करावयाची होती. आमचे काही प्रश्न होते या व इतर समाजाच्या प्रश्ना बाबत मुंबई येथे मंत्रालयात जावे प्रश्न ते सोडविण्यास सहकार्य करीत. मराठवाड्यातील अनेक प्रश्न कै. काकु व आ. जयदत्त क्षिरसागर यांच्या बरोबर चर्चा करून मार्गस्थ लावत असत.