Sant Santaji Maharaj Jagnade
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज या पालख्यांचे स्वागत संताजी ब्रिगेड व जयभवानी टेक्नीकल इंस्टीट्युटच्या वतीने करण्यात आले. येणार्या सर्व वारकरी बंधु आणी भगनींना ४००० बिस्कीट पुड्यांच वाटप करण्यात आले. संस्थेचे पुणे शहर अधयक्ष श्री. संतोषशेठ व्हावळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पुणे शहरात अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम हि संस्था राबवी असुन गरीब महिलांना मोफत साडी वाटप, मोफत शिलाई मशिन, मुलांचा गुणगौरव, जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार अरोग्य शिबीर मोफत शालेय साहित्य वाटप चष्मे वाटप असे अनेक प्रकारचे सामाजीक कार्य श्री. संताजी ब्रिगेड पुणे शहर आणि जय भवानी टेक्नीकल इंस्टीट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने राबीवले जातात.
खालील लेखामध्ये तेली गल्लीचे संपादक श्री. मोहन देशमाने यांच्या मागील महिण्याच्या म्हणजे जुलै 2016 च्या अंकातीलकाही भाग व इतर मुद्दे यामध्ये घेतले असुन समाजाने खरे तर याच मुद्यावर चिंतन करणे गरजेचे आहे. हा लेख म्हणजे सध्याची खरी वस्तुस्थिती आहे. समाजाची वाटचाल कोठे व कशी चालली आहे याचे ज्वलंत उदाहरण मोहनराव देशमाने यांनी त्यांच्याच शब्दात प्रखरपणे मांडले आहे. एक प्रकारची समाजजागृतीच त्यांनी आपल्या लेखणीद्वारे केली आहे.
आणि ती पुन्हा थोड्याशा वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि ती सत्य परिस्थिती आहे.
Teli Samaj Pune Vadhu Var Melava 2015, Teli gali magizine

वि. ल. भाव्यांनी आगदी ब्राह्मण समाजाचा कडाडून विरोध सहन करून संत संताजींच्या वह्या वरून पहिली संत तुकाराम गाथा मुद्रित केली याची जाणीव समाजाला झाली. आपल्या कडे सर्य आहे. आपल्या या सुर्याला काजवा बनविले आहे. याची जाणीव प्रथम कुणाला झाली असेल तर ती रावसाहेब विठ्ठलशेठ नारायण केदारी यांना मुंबईकर मंडळी ते एकत्र आले आणी सुदूंबरे येथे गेले येथील स्थानीक मंडळींनी पिड्यान पिड्या संभाळलेली दौलत म्हणजे संताजी समाधी या समाधी जवळ जाण्यास वाट नव्हती या परिसरात झाडे वाढलेली होती. रावसाहेब केदारी पहिले पुढे गेले. आणि त्यांच्या हाताने झाडे दुर केली. आणि मोजून २०/२५ बांधवांना साक्षीने पहिली पुण्यतिथी साजरी करणारे रावसाहेब होते.

एवढं वैभव दानधर्म, कुटूंबाचा गाडा, समाजातील प्रतिष्ठा ऑनररी मॅजिस्ट्रेट ते रावसाहेब किताब. कुठलाही वडिलोपार्जीत प्रॉपर्टी नसतांना कुणाचही पाबळ नसतांना स्वकष्टार्जीत पैशाने करणारे रावसाहेब दानशुर कर्णच होते.
ब्रिठीशांनी त्यांना रावसाहेब हि पदवी दिली असली तरी, ब्रिटीशांना काडीचाही सुगावा लागू न देता ते भारताच्या स्वातंत्रप्राप्तीसाठी राजकारणात पडद्या आडून सेवा करणारे ते स्वातंत्र्या सेनानीच होते तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आशा नामवंत राजकरण्यांच्या संपर्कात असणारे रावसाहेब राजकारणापासून दूरच होते.
वराहगिरी व्यंकटगिरी राष्ट्रपती असतांना श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना रावसाहेबांना पद्मश्री हा बहुमान देवून सन्मानीत करण्यात आले तो सोहळा अवर्णीय होता.