Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्राची धन दौलत भवानी माता संभाळणारे भगत घराणे होते. त्याच घराण्याचे केशवराव वंशज,. ते पुण्याच्या इतिहासातील पहिले तेली नगराध्यक्ष होते ते ही सन १९३५ -३६ साली. केशवराव सामाजीक जाणीव असलेले बांधव होते. रावसाहेब केदारी यांच्या नेतृत्वाखाली सन १९१९ पासून सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराजांची पुण्यतीथी सार्वजनिक रीत्या सुरू होताच त्यात ही ते सामील झाले. कै. आप्पासाहेब भगतांची इच्छा होती. त्यांचे मत होते की आपल्या समाजाला एक विचारांची बैठक आसावी या साठी आपण प्रयत्न करू या त्यांच्या इच्छे खातर कै. अप्पासाहेबांनी भवानी पेठेतील आपली वास्तु समाजाला दिली. ती काही दिवसात समाजाच्या नावे रितसर ही केली.

दामु धोत्रे हा चार अक्षरांचा आकाशाएवढा माणूस या देशात जन्मास येणे ही या देशाच्या भाग्याची गोष्ट. भारताच्या लोकसंख्येत मूठभर असलेल्या तेली समाज. समाजात जन्म घेणे ही या समाजाची अभिमानाची बाब.
माझे काळीजी कुरतडत गेले, जेव्हा दामू धोत्रे हा माणूस माझा आहे हे समजले तेव्हा. शाळेत पाठ्यक्रमात असलेल्या धड्यातून दामू मुलांना - विद्यार्थ्यांना मी शिकवीत होतोच समाजाच्या इतिहासात संताजी महाराज व गंगू तेलीण ही फक्त ठेव. यांची ठेव तर किती अपुरी ! जेव्हा आपले म्हटले तेव्हा शोधाशोध करून मिळविली त्या माणसाच्या नावाभोवती इतिहास आहे ही समाजाच्या अभिमानाची बाब. ती आम्ही उशीरा का होईना जपतोय.

शेलार सर्कस ही या देशाची शान ठरली. कै. तुकाराम शेठ हे धडपडे व धडाडीचे शुन्याचे विश्व केले. पैसा किर्ती मिळविले पण ते विसरले नाहीत सर्वसामान्यांना अनेक संस्थांना त्यांनी देणग्या व खेळ दिले. सर्कस १९१९ मध्ये नागपूर येथे होती. त्यावेळी समाज परिषद होती. या परिषदेला मदत म्हणुन एक दिवसाचे उत्पन्न देवून टाकले. १९२३ मध्ये समाजाने त्यांना अध्यक्ष पद देवून गौरविले व मानपत्र दिले. मुंबई येथे खेळाच्या निमित्ताने बांधवांना बोलवून संघटनेचा मंत्र दिला.
महाराष्ट्रातील तेली समाजाच्या इतिहासात अनेक बांधव आपल्या वाटचालीने एक आढळ स्थान निर्माण करून आहेत त्या पैकी श्री. रामदास बाबुराव धोत्रे हे एक आहेत याची प्राजंळ नोंद भविष्यात ठेवावी लागेल. शिवरांयांची मावळ्यांची भुमी भोर. भोर या नगरीतुन धोत्रे कुटूंबीय पुण्यात आले. या पुण्यनगरीचे ते एक घटक बनले. वडिल कै. बाबूराव मेहनितीने घर चालवत होते. आई त्यांना साथ सोबत देत होत्या पुण्यात स्थीर झाल्यावर शिक्षण ही एक जादूची कांडी आहे याची जाणीव झाली.
कै. आप्पासाहेब भगत यांच्या इच्छेखातर आपल्या दोन वास्तु समाजाला अर्पण करणारे कै. केशवराव भगत यांच्या पासुन म्हणजे शंभर वर्षा पासुन समाजाला एक बैठक निर्माण झाली. रावसाहेब केदारी, रावसाहेब पन्हाळे, कै. पांडूरंग धोमकर, कै. ऍड. गोविंदराव पवार, कै. रत्नाकर (दादा) भगत, रत्नपारखी, कै. नंदकुमार क्षिरसागर या सारखे माजी अध्यक्ष मार्गदर्शक लाभले. गत ५० वर्षात कै. पुरूषोत्तम व्हावळ, कै. लक्ष्मण अंबिके, कै. बा. ना. केदारी, कै. अमृतराव कर्डीले, कै. जगन्नाथ व्हावळ, कै. आनंदराव व्हावळ, कै. धोंडीराम चोथे, कै. भटजीशेठ शिंदे, कै. ल. वि. शिंदे, कै. विश्वनाथ भगत, कै. बाबुराव रोकडे, कै. बाळासाहेब वाळंजकर आशा मंडळींनी आपला वेळ व शक्ती समाजासाठी खर्च केली