सालाबाद प्रमाणे बारामती येथे पश्चिम महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा अंतर्गत विभागीय भव्य सामुदाईक विवाह सोहळ्याचे आयोजन २ जुन २०१५ रोजी करण्यात आल्याचे किरण मुंबईकर यांनी कोयनानगर कार्यकारीणी बैठकीत घोषणा केली. बारामती तालुक्यातुन सदर बैठकीस विभागीय अध्यक्ष पोपटराव गवळी तसेच जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अजय किर्वे सह प्रविण पवार, विनय किर्वे, नितीन वाईकर, स्वप्नील दळवी, ज्ञानु दळवी सह इतर पदाधिकारी हजर होते.
महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- कोल्हापुर जिल्हा प्रांतीक महासभेचे अध्यक्ष शिवाजीराव माळकर सह इतर १५ पदाधिकारी उपस्थीत होते. माळकर सर हे निवृत्त प्राचार्य असुन सद्या ते महत्वपुर्ण शिक्षण संस्था चालवतात तसेच ते अनेक शिक्षण संस्थावर पदाधिकारी असल्यामुळे कोल्हापुर प्रांतीक महासभेची वाटचाल आशादायी आहे. जिल्ह्यातील लिंगायत तेली समाजाचे महत्वपुर्ण पदाधिकारी सुनिल सावर्डेकर सह सह पांडुरंग वडगांवकर, गणेश वाळवेकर, मोहन फल्ले आदी अनेक पदाधिकारी आवर्जुन बैठकीस उपस्थीतीत होते.
जिल्ह्यातील तीन तालुक्यातुन आमदार पदासाठी तेली समाज तिकीट मागु शकतो अशी परिस्थीती आहे. स्वत: किसन घोडके भाजपा मधुन आमदार की साठी उत्सुक असुन पुढील काळात समाजाचे वतीने तिकीट मागणीसाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येईल
- पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र
परंतु १५ वर्षा पुर्वी महाराष्ट्र तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष पद मिळाले हे मिळाल्या नंतर या पदाला न्याय देणे हे ठरवून ते महाराष्ट्रात फिरू लागले. प्रवास, निवास जेवण हे स्वत: करत सुदुंबरे व नागपुर येथिल महामेळावे भरवणे हे अवघड धनुष्य खांंद्यावर घेतले. ते घेताना समाज ढवळून काढण्यासाठी त्यांनी जिल्हा तालुका व गावे पिंजुन काढली किमान चार लाख बांधव हजारो मैलावूरन सुदूंबरे येथे घेऊन येण्याचे दिव्य त्यांनी यशस्वी केले. या झुंजीत लाखो रूपये गेल. पण मागे सरले नाहीत. परंतु महामेळाव्याद्वारे महाराष्ट्रातील बड्या राजकरण्यांची झोप उडवली हा अफाट समाज जर असाच जागा होऊन संघटीत झाला तर आपले राजकारण तेल्याच्या वळचनीला जाईल. या वेळी काही हुशार मंडळींनी तेली आडवा तेली हटवा हा अघोषीत अजंठा राबवला. मी तेली आहे. आणि तेली म्हणुनच निवडून येतो हे ठसवणारे रामदासजी तडस यांच्यासाठी मोर्चे बांधणी केली. त्यातुन आमदारकीत अपयश दिले. हे अपयश खिशात ठेवून ते समाज पिंजुन काढत होते. ते करिताना घराला घर पण देणारी जवळची ५० एकर जमीन घरापासुन दुर गेली हे शेवटी समजले पण ते डगमगले नाहीत हीच त्यांची तेली निष्ठा.
श्री. रामदास धोत्रे, उपाध्यक्ष महाराष्ट्र तेली महासभा
मा. केशारकाकु क्षिरसागर पुण्यात येत तेंव्हा त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रश्न सोडवत होतो. समाजा बरोबरचे प्रश्न यांचा मागोवा घेत होतो. मा. जयदत्त क्षिरसागर मा. रामदासजी तडस यांच्या बरोबर मुंबई व इतर ठिकाणी भेटी होत तेंव्हा तेली ताकद व तेली प्रश्न समोर येत आशा वेळी समाजाचा एक न भुतो आसा मेळावा निश्चित झाला. मेळाव्याचे ठिकाण सुदुंबरे हे ठरले अतिरेकी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून संत तुकारामांच्या विरोधातील कायदे पायदळी तुडवणारे महान संत संताजी यांच्या समाधी स्थळी सुदूंबरे हे जसे समाधी स्थळ आहे तसेच नजीकच्या देहू याच देहूत संत संताजींनी धन दांडग्या व जात दांडग्यांना तेली ताकद दाखवली. सुदुंबरे येथे महामेळावा निश्चित झाल्या नंतर केशरकांकुचे आशिर्वाद जयदत्त अण्णांचे मार्गदर्शन व तडस साहेबांचे नियोजन हे आम्हा पुणे शहर ग्रामिण बांधवांना आयोजक म्हणुन उपयोगी पडले.