समाजासाठी आपण काहितरी केले पाहिजे हि भावना मनात ठेवुन श्री. मोहन देशमाने हे गावकुस ते तंली गल्ली या मासिकातुन गेली कित्येक वर्षापसु समाज जागृतीचे कार्य करीत आहेत. याचा अनुभव सर्व समाज बांधवांना आहेच समाज जिवनाचा अभ्यास, ओबीसी साठी चाललेली धडपड समाज संघटना समाज प्रबोधन समाजाच्या प्रगतीचा ध्यास हे सर्व तेली गल्ली मासिकाद्वारे आजपर्यंत करीत आलेले आहेत.
पुणे :- श्री. संत संताजी जगनाडे तेली समाज संस्था सुदूंबरे या मध्यवर्ती संस्थेेची कार्यकारणी सभा फुलगांव, ता. हवेली, येथील येवले फॉर्म हाऊस मध्ये संपन्न झाली सभेसाठी पुणे, चाकण, तळेगांव, ढमढेरे, आळे लोणावळा, नगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड अशा विविध परिसरातील समाज बांधव उपस्थीत होते.
श्री. क्षेत्र सुदुंबरे येथील मातृ संस्थेची गत महिण्यात कार्यकारणी मिटींग झाली. तेंव्हा एक भयान शोकांतीका समोर आली. शोकांतिका अशी श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे ही समाज संस्था शतक महोत्सव साजरी करण्यास काही वर्ष बाकी आहे. परंतु या मातृसंस्थे द्वारे श्री संत संताजी समाधी स्थळी मोठ्या प्रमाणात स्मृती दिन साजरा केला जातो. नेहमी प्रमाणो अध्यक्षांनी संस्था कार्यकारणी समोर फलगांव ता. हवेली जि. पुणे येथे वर्षभराचा हिशोब मांडला. खर्च सात लाखा पर्यंत. देणगी व इतर मार्गाने ४ लाख उत्पन्न आता जी काही कारणे आहेत.
श्री. संताजी प्रतिष्ठाण, नगररोडची स्थापना होऊन पहिली मिटींग दि. १/०३/२०१५ रोजी चंदननगर पुणे. येथे पार पडली. मिटींगमध्ये खालील कार्यकारीणीची सर्वानमुते निवड झाली.
संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला. आजोबा भिवाशेठ जगनाडे, वडील विठोबाशेठ व आई सुंदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेल धंद्याचा परिचय करूण दिला. व लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील, यमुनाबाई बरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबाच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दिर्घ आजाराने वारल्या. संताजीला किर्तनात पहाताच तुकारामाना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्या कारणाने. त्यांना संताजी बद्दल प्रेम, आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे महाराजांनी संताजीला आपल्या सानिध्यात ठेवले.