पिंपरी चिंचवड तेली समाज :- पिंपरी या परिसरातील श्री सचिन काळे यांची नियुक्ती तेली महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी झाली जिल्हा अध्यक्ष श्री. संदिप चिलेकर यांनी नुकतेच अधीकार पत्र दिले. या प्रसंगी श्री. विजय रत्नपारखी विभगीय अध्यक्ष, श्री. रमेश भोज कार्याध्यक्ष श्री. संदिप चिलेकर जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीप शिंदे विभागीय सचिव व इतर बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी घटक असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव २७ एप्रिल २०१२ रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे सल्ल्यासाठी पाठविण्यात आला आहे. असे लेखि उत्तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डी. नेपोलियन यांनी गेल्या ८ डिसेंबर रोजी लोकसभेत दिले आहे.
हे सदर मुळात तेली मताचा आवाज आहे. हा आवाज अनेकांना खटकतो हा आवाज अनेकांना परिवर्तन करावयास लावतो. हा आवाज आत्मसंशोधन करावयास लावतो हा आवाज काही फुकट फौजदारांना समाज पातळीवर धावपळ करावयास लावतो. आणि हा आवाज हजारो बांधवांना आपला वाटतो. त्यांच्या मनातील त्यांच्या वेदनांना वाट करून देतो म्हणुन प्रत्येक महिन्याचा अंक मिळताच शेकडो समाज बांधव साथ सोबत देतात. पण हे ही आमचे मत आहे. आम्ही मांडलेले विचार हे पुर्ण सत्य आहे आसे नव्हे यातील उनीवा अजुन सत्य सांगा. मुळात या आवाजा विषयी चुक स्पष्टीकरण किंवा विरोधी मते कळवा. त्यांना प्रसिद्धी देऊ. गाव गप्पा तोंडी विरोध किंवा कुणीतरी सांगीतले म्हणुन मत सांगणे याला किंमत शुन्य कारण हा आवाज मुद्रित केलेला आहे. तेंव्हा आपल्या विचार प्रणाली प्रमाणे मते पाठवा त्याला ही प्रसिद्धी देऊ आता मुळ विषयाकडे वळु.
महाराष्ट्र तेली महासभेने विश्वास दिला म्हणुन उभा राहिलो पदाधिकारी नेमून त्यांना दिशा ही दिली. परंतु समाजात जाताना त्या बांधवांचे अनेक प्रश्न कारण या पुर्वी काहींनी त्यांना अनुभव चांगले दिलेच नव्हते. त्यामुळे ती त्यांची चुक नव्हती . तर त्यांचे सत्य मत बरोबर होते. या मंडळींना कृतीतुन विश्वास दिला. पुस्तक मुद्रित करण्यासाठी गोळा झालेला निधी ज्ञानराज पतसंस्थेत मुदत ठेवीत जमा केला.
कोथरूड येथील शुभेच्छा मंगल कार्यालयात श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने नुकताच तिळगुळ व हळदी-कुंकू तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते २०१५ दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध समाजिक उपक्रम राबविले जाता.