संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला. आजोबा भिवाशेठ जगनाडे, वडील विठोबाशेठ व आई सुंदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेल धंद्याचा परिचय करूण दिला. व लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील, यमुनाबाई बरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबाच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दिर्घ आजाराने वारल्या. संताजीला किर्तनात पहाताच तुकारामाना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्या कारणाने. त्यांना संताजी बद्दल प्रेम, आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे महाराजांनी संताजीला आपल्या सानिध्यात ठेवले.
रविवार दि. १५ फेब्रुवारी २०१५ - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व समस्त तेली समाज संस्था, मुंबई व उपनगरे च्या वतीने महाचिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले. महा ह्यासाठीच म्हणावयाचे कारण म्हणजे १५००० स्वेकर फुटाचा मंडप तो पण लग्ना सारखा. शंभर फुट लांब भव्य स्टेज व त्यावर श्री संत संताजी महाराजांची आठ फुट भव्य मुर्ती,
डॉ सुधाकर चौधरी यांनी डॉ मेघनाथ साहा यांचे जीवनावर एक तास व्याखान दिले. कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थितीत तालुका व जिल्हा पदाधिकार्यांना डॉ मेघनाद साहा यांचा फोटो व माहिती पुस्तिका त्याच्या मार्फत वाटले व पुढच्या वर्षापासून डॉ मेघनाथ साहा यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचे सर्व पदाधिकार्यांना आवाहन केले.
आपले सत्तेसाठी विकलेले नेते. हे आपल्या आरक्षणाला धोके ठरले आहेत. हे जसे सत्य आहे. तेवढेच महाराष्ट्राच्या स्थापने पासून सत्तेत व विरोधात हाच मराठा समाज आहे. फुले, शाहू, अंबेडकरांचे नाव सांगून त्यांची समता, स्वातंत्र्य व त्याग आज मलिन केला गेला आहे. प्रथम जाती पाहून तिकीट वाटप व सामदाम, दंड फोडा व झोडा आशा तंत्रांचा वापर करून विजयाची घोडदौड. मते हवीत पण यांच्या विकासाचा मुद्दा येताच या मंडळीनी आपल्या हितासाठी खेडोपाड्यातील गरिब मराठा व ओबीसी यांच्या मध्ये कलगी तुरा आसा सामना लावून गरिब मराठ्यासाठी लढतो हे बुजगावणे उभे केले. ना यांना गरिब मराठ्यांचे प्रेम ना ओबीसी अस्था. कारण घटने नुसार आरक्षण देता येत नाही हे सिद्ध झालेच आहे. पण लढाई जुंपुन तोंडाला पाने पुसण्याचा हा सर्व प्रकार महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूकी दरम्यान सुरू आसतो. मराठा समाजातील काही राजकीय व्यक्ती आमदार खासदार होण्यसाठी मराठा हा मुद्दा घेऊन वाजवत ठेवतात. कारण याच बळावर मराठा सत्तेत जास्त येतो हे गणित मांडले जाते यासाठी ना. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली. कमिटी या देशाच्या संविधानाला बांधील नसते तर बांधील आसतो आयोग म्हणून आयोग कायदेशीर व कमिटी ही दांडगाई.