संघटनेच्या माध्यमातुन समाज कार्य करत असताना आम्हाला जाती-जातीच्या भिंती उभ्या करावयाच्या नाहीत. भारतीय राज्य घटनेंशी आम्ही बांधील आहोत. जाती पोट-जाती निर्मुलन व जाती अंता साठी लढाई हे आमचे अंतीम उद्दीष्ट आहे. आमचे या तेली संघटनेचे कार्य म्हणजे, आमची ही न्याय हक्कासाठी ची, समता समानता प्रस्थापित करण्याची व परिवर्तनाची चळवळ आहे.
संताजी फाऊंडेशनचे मुख्य उद्देश असा आहे की समाजातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन समाजाची उन्नती करणे एकमेकांना सहकार्य करणे, निकोप व समृद्ध समाज तयार करून जे उच्चशिक्षीत / विचारवंत समाज बांधव समाजापासुन दुर आहेत अशांना एकत्र समाज प्रवाहात आणणे व त्यांना समाजा साठी आपण काही तरी करावे अशी भावना त्यांच्यात जागृत करणे
पुण्याचे जुने जाणते बांधव कै. बाबुराव करपे यांच्या सुन सौ. निता करपे. या संगमनेर जि. नगर येथील श्री. सुरेश बाबुराव रहातेकर यांच्या कन्या श्री. रहातेकर संगमनेर नगर पालीकेचे १५ वर्ष नगर सेवक होते. निता यांना समाज सेवेचे बाळकडु लहानपणीच मिळाले. कै. बाबुराव करपे घराण्यात आल्या. येथेही त्या सममाज कार्यात मग्न झाल्या. कै. बाबुराव करपे हे एक जाणते व प्रतिष्ठीत बांधव होते.
सदरच्या संस्थेतील शिस्तबद्ध कामाचे नियोजन तसेच पदाधिकार्यांची सामाजासाठी असलेली आपुलकी सर्व घटकांना एकत्र आणण्याची प्रवृत्ती व समाजाचे जीवनमान कशा प्रकारे उन्नत करता येईल या बाबींची तळमळ मला जाणवली मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून या संस्थेत कार्यरत असलो तरी घेण्यात येणारे निर्णय हे सर्वानुमते घेतले जातात ही बाब उल्लेखनिय आहे.
संताजी फांऊंडेशन पुणे, ही तेली समाजातील एक सामाजिक जाणिव असलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना झाल्या पासून आजपर्यंत या संस्थेमध्ये मी काम करत आहे. संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. प्रकाशशेठ पवार यांच्या योग्य मार्गदर्शना खाली संस्थेचे कामकाज अतिशय सुरळीत पणे चालु आहे. संताजी फाऊंडेशन ही संस्था कोणत्याही प्रकारच आर्थिक सहाय्य न घेता स्वखर्चांने उच्चशिक्षितांचे वधु-वर मेळावे वर्षातून दोन वेळा आयोजित करते.