सोमेश्वर नगर येथिल महाविद्यालयात तेलघाना अडगळीत गेला म्हणुन विठ्ठल पांडूरंग वाईकर यांनी शिपायाची नोकरी स्विकारली त्यांना एकुण 6 मुल. या मुलांचा संभाळत या नोकरीवर करीत. घरी येऊन गावात केरासीन विकत. या विक्री साठी घरातील सर्व सहकार्य करीत. मोठ्या चिरंजीवानी रॉकेल विक्रीला चांगले रुप दिले. प्रचलीत असलेल्या शासकीय नेमांचा आधार घेऊन ते व्यवासाय करीत होते. त्यामुळे तेल व्यवसायाशी जवळचा संबध आला. सातारा येथील दिपक प्रल्हाद इंगळे यांचा संबंध होता. त्यांचा फलटण जवळ बरड येथे पेट्रोल पंप होता.
आज सज्जनगडाच्या पायथ्याला आनंदी नावाचे हॉटेल सुरु केले आहे. श्री. सोमनाथ यांचा समाज कारण राजकारणच पिंड यामुळेच त परळी गावचे सरपंच ही होते. गावाच्या विकासात सहभाग घेतात. तेली समाजाचे संघटन व्हावे या धडपडीतुन त्यांनी वाटचाल केली. सातारा समाज संस्थेने वधुवर मेळावे ही संकल्पना रूढ करिताना त्यांनी हवी ती मदत दिली एक वेळ ते मेळावा अध्यक्ष होते. तेली गल्ली या मासिकाच्या धडपडीला त्यांचा हातभार आसतोच.
श्री. जयसिंगराव कृष्णाजी दळवी यांचा जन्म सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या, श्री रामदास स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या परळी येथे झाला. श्री. कृष्णाजी सावळाराम दळवी व सौ. तानुबाई कृष्णाजी दळवी यांचे हे चौथे अपत्य. 1 बहिण व चार भाऊ अशा कुटुंबामध्ये अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही परळी येथील शाळेत 7 वी पर्यंत शिक्षण घेतले. परंतु घरच्या परिस्थितीमुळे दुध डेअरी मध्ये 30 रूपये महिना पगारावर नोकरी सुद्धा केली.
माझा उमेदीचा काळ होता. अगदी लहान होतो तेंव्हा ही पाटणचे कै सिताराम बापू गावात आल्यावर घरी येत. चादरीवर किंवा पोत्यावर बसुन चहा पित. कै. सिताराम बापू व त्यांचे बंधु कै. अबा हे आपले मोठे पण विसरून समाजाचे बनत. ही त्यांची ओळख घाटावर किंवा कोकणात पहावयास मिळत असे. मी विष्णू बाळा पाटील यांच्या विषयी लेखन करीत होतो तेंव्हा 1982 साली त्यांचा प्रथम जवळचा संबंध आला. विष्णु बाळा पाटील यांच्या विषयी पुरक माहिती दिलीच परंतू मला पाटणचे शेडगे समजून घेता आले.
कै. शांताराम दळवी यांचा जन्म 2 जुन 1937 रोजी परळी (सज्जनगड), ता. जि. सातारा येथे अत्यंत गरीब कुंटूंबात झाला. त्यांना एकुण सात भाऊ दोन बहीणी असा परिवार होता. घरामध्ये अत्यंत हलाखाची परिस्थिती आणि या घरामध्ये शिक्षणाचा साधा स्पर्शही नव्हता. परंतु अशाही परिस्थीतीत त्यांनी इयत्ता चौथी पर्यतचे शिक्षण पुर्ण केल. परंतु त्यांची बुद्धीमत्ता फार मोठी वाखाण्यााजोगी होती. ते सर्व त्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या खुबीन तोंडी करायचे. कै. शांताराम दळवी हे संपुर्ण परळी भागात व सातारा जिल्ह्यामध्ये नाना या नावान सुपरिचीत होते.