Sant Santaji Maharaj Jagnade
इलाहाबाद :- हर हर मोदी घर घर मोदी ? पंतप्रधान तेली आहेत आपला अभिमान देशाचा पंतप्रधान म्हणुन महाराष्ट्रात व देशभरात मोदींच्या तेली जन्मा मुळे हिमालयाची उंची गाठणारे प्रेम निर्माण करून लाभार्थी होण्यासाठी तुकडा सुद्धा पुरा आहे. आणी तो मिळवणारे आहेत. त्या साठी तेली समाजाचे संघटन कामाला जुंपवून मिळालेला तुकडा म्हणजे संपूर्ण सुर्य समजुन सत्काराचे फड गाजवणारे आहेत.
पुणे :- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या पक्षाला जर कोणी मानसाळले असेल तर स्व. गोपिनाथ मुंडे, अन्ना डांगे, एकनाथ खडसे यांनी. यांनी मराठा समाजाचा काँग्रेस ला अंगावर घेत ओबीसींना जागे करून भाजपा बरोबर उभे केले. यातील मुंडे यांना गाडीने मारले जसे संत तुकारामांना नेमक्या धुळवडी दिवशी विमानाने स्वर्गात घेऊन गेले. एवढी संशयित घटना घडुन ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे जन्माने ब्राह्मण असुन ही त्यांना विश्वास दिला.
अमरावती चांदूर रेल्वेच्या पासुन दूर भुईखेड गावाच्या नावात खेड त्या मुळे गाव सर्व सुख सोईना पारख असलेले. पाऊस काळात तर कोणत्याही दिशेला चालत जावा या रस्त्यावर किमान दहा बारा मैल चिखल तुडवत जावे लागत होते यात जयराम गुल्हाणे वस्तीकरून रहात होते. वस्ती या साठी की गावात घर आहे पण शिवारात शेत नाही. त्यामुळे 1 मुली 2 मुलगे यांना मोठे करण्यासाठी ते गावात मिळेल ते काम. शिवारात मिळेल ती मजुरी करून वावरत होते. घर सावरत होते. याच झाकाळलेल्या घरात श्री. विठ्ललराव गुल्हाणे यांचा जन्म झाला. असेच झाकोळलेल्या घरात वावरत होते. मुलांना जगवलेे पाहिजे ही धडपड ती पुर्ण करण्यास दिवस अपुरा पडत होता.
तळेगांव दाभाडे दि. 13 :- सालाबादप्रमाणे दि. 11 एप्रिल रोजी तेली आळीतील मारूती मंदिर येथे हनुमान जयंती महोतसव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.
पहाटे 5 वाजता प्रथेप्रमाणे तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संदिप पिंगळे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. 5.30 ते 7 वा. या वेेळेत ह. भ. प. नितीन महाराज काकडे यांचे हनुमानजन्मावर कीर्तन झाले. संपूर्ण दिवसभर समितीच्या वतिने मंदिरामध्ये प्रसाद वितरित करण्यात आला. रात्री 8 वा. सौ. चित्रा जगनाडे, संदीप जगनाडे, पोपटभाऊ जगनाडे, तनुंजा जगनाडे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
नाशिक - तेली समाजासाठी कार्य करणार्या श्रीग्रुप फाउंडेशनच्या वतीने अयोजित वंचितांच्या वूध-वर मेळाव्यासाठी यंदा तब्बल 400 इच्छुकांची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यात आर्थिक दुर्बल, अंध, मुक - बधिर, घटस्फोटित, विधूर, विधवा व वयस्कर वधू -वरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यानिमित्ताने त्यांच्यासाठी आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळण्याचा योग आला होता.