Sant Santaji Maharaj Jagnade
तेंव्हा त्यांनी आपल्या राजेंद्र या मुलाला जामगाव, ता. पारनेर इथे त्याच्या मामाकडे शाळे साठी पाठवले. या खेड गावात इ. 5 वी ते इ. 10 वी पर्यंत शिक्षण घेत होते. शिक्षण पुर्ण होताच पुढे काय हा घरात प्रश्न होताच बारामतीच्या मंडईत किंवा आजुबाजूच्या गावात जावुन बाजार करावा उत्पन्न ही तोकडे भांडवलही तोकडे ही कसरत एक वर्ष तरी ही करावी लागली. बारामतीतच श्री. हरीभाऊ पोटे काका होते. यांच्याकडे सन 1980 मध्ये कामाला लागले. पगार तरी किती फक्त 90 रुपये . हे 90 रुपये घराला गरजेचे होते. इथे तेल उत्पादनाचे नवे तंत्र समजुन घेता आले.
कै. जयप्रकाश किर्वे श्रद्धाळु होते. सामाजीक जाणीवेचे होते. त्यातुन वावरत होते. श्री. संभाजींनी तोच विचाराचा धागा पुढे चालविला. शनी मंदिराच्या जीर्णोद्धारात ते आघडीवर होते. बारामतीची साठवण तेली पंच मारूती मंदिर या मंदिराचे सलग 5 वर्षे ट्रस्टी होत. त्यांनी या साठवण असलेल्या संस्थेचे उपाध्यक्ष पद ही विश्वासाने संभाळलेले आहे. याच बारामती येथे श्री. संताजी महाराजांचा जन्म उत्सव यशस्वी पणे पार पाडला आहे.
लोकशाहीत आपण राजकारणा पासुन दूर राहू शकत नाही. लोकशाहीत आपण समाज कारणा पासुन दुर राहू शकत नाही याच मुळे श्री. सुरेश पितळे व सुभाष गर्जे यांचा संबंध आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात संबंध येऊ लागले. सत्ता स्थान व समाजसेवा याची ओळख झाली. यातुनच भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, मा. पंतप्रधान चंद्रशेखर, माजी उपप्रधान यशवतंराव चव्हाण, जाणता राजा मा. शरद पवार यांच्या संपर्कात ते अनेक वेळा आले.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
या देशाच्या मुख्य प्रवाहात 85 टक्के मागासवर्ग यावा या साठी केंद्र शासनाने नचिअप्पन रिपोर्ट शासनाला सादर केला. परंतु हा रिपोर्ट सर्व पक्षीय असलेल्या क्षत्रिय व ब्राह्मण जातींनी गुंडाळुन ठेवण्यात देशप्रेम मानले आहे. हा रिपोर्ट काय आहे याची साधी तोंड ओळख सुद्धा देत नाहीत. काँग्रेस प्रणीत व भाजपा शासनाने या विषयी तोंडावर बोट व हाताची घडी ठेवली आहे. कारण हा रिपोर्ट म्हणजे हा खरा लोकशाहीचा गाभा आहे.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
मराठा हे आमचे भाऊ आहेत. पण मराठा पण उरात बाळगुन जे अन्याय करतात ते आमचे भाऊ होऊ शकत नाहीत. कारण या मंडळींनी आपल्या भावकीचा विकास होऊ दिला नाही. सत्ता स्वत: भवती राबवली. गावचा सरपंच,पाटील, तेली, तांबोळी, गुरव आशा जातीचा नको या साठी या मंडळींचा प्रखर विरोध नंतर लबाडी सुरू करून या देशाची संवीधान दुर केले आहे. या विषयी जो कोण आवाज उठवेल त्याला साम दाम भेद या मार्गाने संपवणे याचे जिवंत उदाहरण आपण जागो जागी पहातो. याची खरी सुरूवात ब्राह्मण्या पासून सुरू होते मंडलला प्रखर विरोध करून कमंडलला प्रतिष्ठित करून एक मानसिकता निर्माण करणे आपण हिंदू आहोत तसे पाहिले तर 52 टक्के ओबीसी मध्ये 44 टक्के हिंदू ओबीसी आहेत.