Sant Santaji Maharaj Jagnade
क्षणभर मागे पहिले तर जवळ काहीच नवहते कै. रामचंद्र भोज हे बरोबर विश्वास व धडपड घेऊन आले. आणी स्वकष्टावर भोज कुटूंबानी गरूड भरारी घेतली श्री. विजय भोज हे सामाजीक जाणीव असलेले बांधव पुर्वी 82 भवानी पेठ या समाज संसथेशी उपनगरे संलग्न नव्हती. आशा वेळी स्थानीक प्रश्न सोडविण्यासाठी कोथरूड येथे संताजी प्रतिष्ठान उभे राहू लागले श्री. भोज यात सामील झाले. वधुवर मेळावा स्नेहमेळावे संस्थेचे विविध उपक्रम यशस्वी करण्यात सहभाग. आज या संस्थेचे एक जबाबदार घटक म्हणून कार्यरथ आहेत पाटणहुन या मातीत उभे राहुन झेप घेणार्या भोज कुटूंबीयांना हार्दिक शुभेच्छा.
फलटणकर हे फलटनचे यांचे मुळ नाव चिंचकर दुष्काळामुळे गाळाप करण्यास करडी शेंगा नाहित म्हणुन मिरज मार्गे कर्नाटक हुबळी येथे गेले. कै. विष्णु फलटणकर व त्यांच्या वडिलांनी प्रथम आपला तेल घाना सुर केला. हुबळीच्या अक्की होंड पसिरात उद्योगाला चालना मिळाली. आणि ते एका एकी कानडी परिसराचे झाले परंतु नाते संबंध सातारच्या माती बरोबर ठेवले.
समाजीक बांधीलकीचे संपादक व महाराष्ट्र तेली महासभेचे प्रसिद्धी प्रमुख श्री. दिलिप चौधरी यांच्या मातोश्रींचे वयोमानाने निधन झाले. त्यांना सर्वातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विशेष शैक्षणिक सुविधा बंद कराव्यात अशी तरतूद राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरणातील मसुद्यात केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या वर टीका केल्यामुळे राज्य शासनाने अनुसूचित जाती व जमाती बाबतच्या तरतुदी त्या मसुद्यातून वगळल्या आहेत.
ओबीसींच्या भरवशावर आपण राज्याचे मुख्यमंत्री झालात याचेही आम्हाला अभिमान वाटत होते. परंतु वर्ष लोटूनही विरोधी पक्षात असताना ज्या ओबीसींसाठी आपण आक्रमकपणा घ्यायचे त्या ओबीसी समाजाच्या एकही विषयाला अद्यापही हात घातला नाही. यावरून आपण ओबीसी समाजाचा वापर मतासाठी तर केला नाही ना असे वाटू लागल्याचा उल्लेख ही पत्रात केला आहे.