Sant Santaji Maharaj Jagnade
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
कारण स्वातंत्र्याची सर्व सत्तास्थाने जवळ असताना फक्त आणि फक्त आपला व आपल्या सग्या सोयर्यांचा विकास करणारे जवळ जवळ महाराष्ट्रात शेकडो मराठा घराणी आहेत. राजकीय सत्ता, सहकार, शैक्षणिक संस्था याच सामाजाच्या ताब्यात आहेत. लाखो रूपये घेऊन शैक्षणिक प्रवेश देऊन शिक्षण सम्राट झोलेल्या या मराठा सम्राटांनी आपल्या किती गरिब मराठ्यांना मोफत शिक्षण दिले ? सहकार प्रणली या मराठा मंडळीच्या ताब्यात. सहकार वाढवावा तो उद्धार कर्ता व्हावा यासाठी आजपर्यंत मोजता येणार नाही इतका निधी शासनाचा ओतला तरी सहकार संपू लागला. अनेक साखर कारखाने, अनेक सहकारी उद्योग दिवाळे वाजवू लागले यातला पैसा गरिब मराठ्यांना का देऊ केला नाही.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
मराठा, पटेल, जाट हे प्रगत समाज आज पर्यंत स्वातंत्र्यात संघटीत पणे यांनी राजकीय सत्ता उद्योग, सहकार, शैक्षणिक संस्था शासकीय नोकरी यात आपला सहभाग मोठा ठेवला मंडल मुळे त्याला धक्का बसताच विरोध ही केला. विरोधाने संविधान बदलत नाही. म्हणताच आम्ही ओबीसी आहोत. आम्हाला ओबीसी करा. आमचे हाक्क आम्हाला द्या. आमच्यात गरिब आहेत. या गरिबांना हाक्क द्या ही हाक देऊन रस्तयावर उतरणे.
मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
माझे मित्र दत्ता सामंत यांच्या लढ्यात लढलेले बांधव. गिरणगावात उध्वस्त होताच गावात स्थीर झाले. जमेल तो उद्योग करीत प्रतिष्ठीत बनले. आपले ओबीसी पण जिवंत ठेवत ग्रा. पंचायतीसाठी उभे राहिले. समोर उभा गावचा पाटील त्याची पाटीलकी, त्याचे मराठा पण त्या समोर अव्हान उभे राहिले. त्या वार्डात 75 % ओबीसी असतानाही जातीवंत ओबीसी असतानाही पाटला समोर पालापाचोळा झाला. पाटलाला अव्हान देतो म्हणताच व्यवसाय अडचनीत आला खोट्या केसेसचा फेरा सुरू झाला. त्यांची शोचनीय अवस्था पाहुन सर्वच ओबीसी इतके खचले, इतके पिचले की 96 कुळी पाटालालाच आपला ओबीसी समजु लागला. ही शोकांतिका परवाच्या निवडणूकीत जवळ जवळ सर्व ठिकाणी समोर आली.
माळी, सुतार, लोहार, शिंपी, गुरव, तेली, साळी, धनगर, परिट आशा जाती टाचे खाली आल्या या जातींना स्वातंत्र्याने मतांचा अधीकर दिला. परंतु स्वातंंत्र्याचा अधीकार हिसकावुन घेतला. सत्ताधीश मराठा विरोधक मराठा. मत न दिल्यास गावात रहाण्याचा अधीकार संपुष्टात येत होता. सत्तेत सहभाग घेऊ पहाताच तिरकी वाट लावत होती. देशोधडिस गेलेल्या ब्राह्मणांनी शहरे आपली केली.
पौड - मुळशी तालुक्यातील या गावाला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र पुर्व काळात व स्वांतत्र्यात ही तेली समाजाने गावाचे व तालुक्याचे नेतृत्व केले आहे. गावची पाटलकी समाज बांधवाकडे आसते. श्रीमती जनबाई इप्ते ह्या जि.प. चया सभापती होत्या. सौ. उज्वला पिंगळे ह्यां तालुका सभापती होत्या. सरपंच, उपसरपंच पद समाजाकडे अनेक वर्षे होते व आहे. परंतु डोगराळ भागातील समाजाचे संघटन खरावेडे येथून होत होते. यात सुसुत्रता यावी व बांधव मध्यवर्ती ठिकाणी सलग्न व्हावेत या साठी महाराष्ट्र तैलीक महासभे तर्फे सहविचारसभा घेण्यात आली. या साठी महाराष्ट्र प्रातिक महासभा उत्तरचे अध्यक्ष श्री. महादेव फल्ले यांच्या नेतृत्वाखाली श्री. प्रकाश गिधे उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे जेष्ठ बांधव श्री. गजानन घाटकर गेले होते सुसंवादातून संघटनेला दिशा मिळेल असे श्री. प्रकाश गिधे कळवितात.