Sant Santaji Maharaj Jagnade
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (5)
अगदी २००३ ला आसा राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसच्या शरद पवारांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी सुदूंबरे येथे मेळावा घेतला. आणी तारणकर्ते ठरणार म्हणुन मा. छगन भुजबळ यांच्या सह मा. जयदत्त क्षिरसागर यांना वाटले. पण सत्य काय याच वेळी मराठा - कुणबी ही अस्तीवात नसलेली जात निर्माण केली गेली. हे प्रमाण पत्र मिळवण्यासाठी काही लाख लागतात.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (4)
आपण आपल्या सह समाजाला ओबीसी संघर्षात आना तेंव्हा ते म्हणाले ओबीसीत दम नाही आता मला सांगा ४४ टक्के मधे तेली १० ते १२ टक्के मग या बहुसंख्य समाजाचे नेते जर संघर्षाच्या रस्त्यावरून पळुन जात असतील समाज पातळीवरील चिंतन शिबीरात संघर्षाची गर्जना देत असतील तर समाजाला या भूताबरोबर किती लढावयास लावणार. हा प्रश्न या ठिकाणाी उभ रहातो. कारण हे हाय कमांड जे बोलते तेच वाक्य जेंव्हा त्यांनी नेमलेले पदाधीकारी आगदी तसेच बोलतात तेंव्हा खर्या संघर्षा पासून समाज किती दूर आहे हे समोर येते.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (3)
मी २००९ साली मराठे आपले भाऊ आहेत का ? या नावाचे पुस्तक लेखन करून प्रसिद्ध केले. २०१३ साली खर्या ओबीसींवर होणारा अन्याय हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुणे येथे ओबीसी तर्फे आरक्षण बचाव अभियानांतर्गत जो मोर्चा २०-११-२०१३ काढला त्यात सुकाणा समितीचा प्रमुख होतो. मराठ्यांच्या ओबीसीतील घुसखोरी बाबत ऑगष्ट २०१३ मध्ये पुण्यात अभियान संपन्न केले. हजारो ओबीसींच्या जाहिर परिषदा महाराष्ट्रात घेतल्या. म्हणुन अधीकाराने सांगू शकतो. समाज पातळीवर फड गाजवणारी फडकरी मंडळी तेंव्हा कोठे होती ?
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (2)
विदर्भ तेली संघर्ष समितीचे प्रमुख मधुकर वाघमारे यांनी ४ पानी पत्रक तेली समाजाच्या राजकीय मंडळींना दिले. तसेच प्रसिद्धीस ही दिले. पण समाजाच्या खासदार, आमदार व राजकीय क्षेत्रातील मंडळींना साधी या पत्राची दखल ही घ्यावी वाटली नाही. तेली समाजाचे नाव पाहिजे. तेली समाजाची मते पाहिजेत. पण समाजाच्या हिताचा विचार येताच आपली सोय पाहिली जाते. परवा बिड मधील बातमी वार्या सारखी पसरली काही हौश्यांनी समाज पातळीवर आपल्या समाज निष्ठेचे प्रदर्शन ही भरवले.
महाराष्ट्रातील अनेक ओ.बी.सी. संघटना व कार्यकर्त्यानी आमदार श्री. जयदत्त क्षिरसागर यांचे आभार मानले होते. झुंडशाहीने मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास जो दबाव गट निर्माण केला होता त्यातील आमदार श्री. विनायक मेटे यांचा लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचा पराभव केला होता.