Sant Santaji Maharaj Jagnade
ह.भ.प. दहितुले बुवा मानव म्हणुन जगले. चार रूपये कमवुन देान रूपये इतरा साठी देत होते. अनेक गोर गरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत त्यांनी केली. अनेक मंदिरांना त्यांनी साह्य केले. मंदिरात मुर्ती दिल्या. गरिबांची लग्ने लावून दिली अडचनीत आलेल्या संसाराला हातभार लावला पंढरपूर येथे पालखी सोहळ्यास १४ गुंठे जागा घेण्या साठी उसनवार पैसेे दिले. पंढरपुर येथे संताजी मंदिर ही उभे केले. संत संताजी जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे ते काही वर्ष अध्यक्ष ही होते. गाणगापूर येथे जावून त्यांनी आश्रमाची उभारणी केली.
थोड्याच काळात ते संताजी मय झाले घरी आल्यावर, तुकोबांची गाथा ज्ञानेश्वरी सुनाकडून वाचुन घेऊ लागले. हरीपाठ वाचून घेता घेता पाठ करू या ही पेक्षा ते संताजी मय झाले. यातूनच एक विचार जोपासला ते रहात असलेला परिसर पुण्या लगत परंतू तसा माळरानाचा. आपली भरपूर जागा व शेती. या परिसरात संताजी मंदिर बांधवयाचे व परिसराला संताजी नगर नाव द्यावयाचे. हा विचार घरात सांगीतला सांगताना हे ही सांगीतले मी कष्ट करेल त्या कष्टातून मंदिर उभे करेल.
![]()
पुणे :- संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचा विशेष अंक प्रसिद्ध करीत आहे. म्हणताच काही जागृत बांधवांनी प्रत्यक्ष भेटून काही बाबी स्पष्ट केल्या. सन १९८५ मध्ये नोंदणी करताना जे ट्रस्टी नमूद केले तेच ट्रस्टी आज ही धर्मादय आयुक्त कार्यालयातील नोंदीत कायम आहेत. आज तीस वर्ष या घटनेला झालेत. वयोमाना नुसार बरेच ट्रस्टी मृत्यू पावले यातील ४ ते ५ ट्रस्टी आहेत.
पुस्तकी ज्ञानाच्या पदव्या देणारी अनेक विद्यापीठ आहेत. या पदव्या मुळे मान सन्मान मिळतो. नोकरी ही मिळते. ही वास्तवता आसते. या पदव्या पेक्षा ही माणूस वाचण्याची माणुस समजुन घेण्याची माणुसकी जपण्याची रोजची भाकर मिळवण्याची घराला घरपण देणारी जी पदवी आसते. ती पुस्तकांच्या अभ्यासातून मिळेलच असे नाही. इथे शिक्षक आपणच आसतो. इथे प्रश्नकर्ते व उत्तरकर्ते आपणच आसतो. इथे मिळालेल्या पदवीतून रोजची भाकर मिळते. ही कष्टाची भाकर शांत झोपू देते. ही कष्टाची भाकर जीवन घडवू शकते. याचा जीवंत पणा परवा पुण्याच्या डेक्कन जीमखान्यावरील श्री. प्रविण गोपाळ येवले यांच्याकडे गेल्या नंतर आला.
संग्रहक (श्री गंगाधर काशिनाथ हाडके)
कै. ह. भ. प. श्री. वैद्य महाराजांनी श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेचे मध्ये चंदनापरी देह झिजवून संपूर्ण जीवन अविवाहीत राहुन संस्थेचे मध्ये हजारो लाखो गुणवान विद्यार्थी घडविले ते आज संपुर्ण देशात सांप्रदायांचे कार्याचा झेंडा मिरवित आहेत. त्यांमध्ये नामकंत रामचरित्र कथाकार ह. भ. प. ढोक महाराजा सारखे महान विभुती त्यांचे शिष्य गण आहेत.