वरणगाव : वरणगाव येथे समस्त तेली समाजाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराजांच्या मुळ गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ता दींडी सोहळा आयोजित करण्यात आला होता . तसेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.
जालना, दि.१ : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार हे प्रेरणादायी असून, संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. आज समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे असे प्रदिपादन ह.भ.प. योगीराज महाराज यांनी केले. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जालना शहरात कन्हैयानगरात जानेवारी रोजी कार्यक्रम घेण्यात आला.
वै. ह. भ. प. भागवत गुंडोजी महाराज पवार, यांच्या प्रेरणेने व स्व. आसाराम पांडरंग व्यवहारे यांच्या अखंडीत परंपरेने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या २३३ व्या पुण्यतिथी गेल्या ५१ वर्षापासून साजरी होत आहे त्यानिमीत्त "श्री हरिकिर्तन सोहळा " "चारीता गोधन माझे गुंतले वचन" "आम्ही केले येने एका तेलीया कारणे" तेली झालो तेली झालो घाणा वाह्याशी शिकलो ।। घाणा बुध्दीचा बळकट | आत विवेकाची लाट।। अशा माशा तेल काढु। वासनेची ढेप फोडू। ऐसे काढुनिया तेल । संत पेठेत ही केल ।। संतू तेली घाणा काढी । तोटा नाही कधी काळी ।।
पिंपळनेर : येथील तेली समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी पांडुरंग सूर्यवंशी, तर उपाध्यक्षपदी सुभाष नेरकर यांची निवड करण्यात आली. तैलीक समाज कार्यालयात नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी बैठक झाली. उर्वरित कार्यकारिणी अशीकार्यअध्यक्ष देविदास कृष्णा नेरकर,सचिव भरत बागुल, खजिनदार देविदास महाले यांची निवड करण्यात आली
जळगाव जामोद संग्रामपुर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधू वर परीचय मेळावा समाज बांधवांच्या उपस्थितीत कोरोना नियमाचे पालन करून संपन्न झाला. कोरोणाच्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपापल्या वधू व वरांचे लग्न जुळवण्यासाठी गावोगाव न फिरता जळगाव जामोद संग्रामपूर तेली समाजाच्या सहकार्याने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन १९ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव जामोद येथे सकाळी दहा ते पाच या कालावधीत करण्यात आले होते.