श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
दारुणकर यांचा जन्म २९-११-१९२५ रोजी झाला. त्यांनी इ. स. १९४६ पासून सार्वजनिक व सामाजिक कार्यास सुरुवात केली. नगर शहर पालिकेचे दोन वेळा अध्यक्षपद, दोन वेळा स्थायी समिती चेअरमनपद आणि १९५२ ते ७४ पर्यंत ते नगरसेवक होते. नगरपालिकेत काम करीत असताना त्यांनी अनेक विधायक व सामजिक स्वरूपाची कामे केली आहेत.
अर्जुनराव मारुतीराव इंगळे, B.Sc. special Executive magistrate
सेकेटरी, तिळवण तेली समाज ट्रस्ट, अहमदनगर अर्जुन राव यांचा जन्म अहमदनगर येथे १८ मार्च १९३९ रोजी झाला. यांचे इंगळे घराणे हे अहमदनगर येथील तिळवण तेली समाजातील प्रसिद्ध व सुखवस्तु घराणे म्हणून ओळखले जाते. कै. काशिनाथ भिवसेन इंगळे तसेच कै. दशरथ व कै. बाबुराव इंगळे हे तीन बंधु या घराण्याचे आधार स्तंभ होत.
तेली गल्ली, एप्रिल 2010
पुणे - तिळवण तेली समाज संस्था भवानी पेठ पुणे या संस्थेची निवडणूक डिसेंबर २००८ मध्ये झाली होती. यावेळी परिवर्तन पॅनेलचे १५ जन बहुमताने निवडुन आले. पहिल्या प्रथम श्री. रामदास धोत्रे संस्था अध्यक्ष झाले. त्यांनी पुर्वी ठरल्या प्रमाणे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा समाज विश्वस्ता कडे जमा केला. त्या नंतर १५ सदस्यांच्या मिटींग मध्ये श्री. संजय दत्तात्रय भगत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
एप्रिल 2010, लेखक : श्री. मोहन देशमाने
महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती. कारण ते त्या जातीत जन्मले आणि अहंकारात वाढले. अहंकार जपने हा त्यांच्या जगण्याचा महामार्ग आहे. त्या मार्गाने जे जाणार त्यांनी त्यांचे काम केले.
बालमटाकळी - मुर्ती ही दगडाची असो वा कारागिरांनी बनवलेल्या कोणत्याही धातूची असो तिची विधिवत पूजा करून तिची प्राणप्रतिष्ठा केली जावे म्हणजे तिच्यात प्राणवत रूप प्राप्त होते. त्यामुळे सर्वजण तिच्यापुढे मोठ्या भक्तीभावाने माथा टेकतात म्हणजे तिच्यात सजीव चैतन्य असते हे सर्वजण मानतात परंतु आता सामाजिक सर्व स्तरीय पिछेहाट पाहता समाजात प्राण ओतण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आ. शिवाजीराव चोथे यांनी केले.