Sant Santaji Maharaj Jagnade
संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महारांजाचे शिष्य होते. व ते तेली समाजाचे होते. खरेतर संताना जात नसते. संताचे कार्य अखिल मानव जातीच्या उध्दारासाठीच असते. जगनाडे महाराजाचा जन्म 8 डिसेंबर 1624 मध्ये पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातील खेड जवळील संदुबरे येथे झाला. संताजी महाराजाचे वडीलांचे नाव विठोबा जगनाडे व आईचे नाव माथाबाई असे होते. हे पांडुरंगाचे निरसीम भक्त होते. त्यामुळे लहानपणापासुन महाराजांच्या बालमनावर धार्मीकतेचा पगडा होता. त्यांचे घरची आर्थीक परिस्थिती चांगली होती. श्री. संताजी जगनाडे महाराजांचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब करता येणे एवढेच मर्यादीत होते.
श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे, श्री संताजी भगिनी मंच, ठाणे, श्री संताजी युवा मंच, ठाणे आयोजित ठाणे शहर तेली समाजातील शासकीय अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तींचा सत्कार सोहळा.
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात शासन आदेशानुसार जयंती साजरी करण्यात येणार आहे. पिंपरी -चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने प्रथमच दिनांक ८/१२/२०१९ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पिंपरी येथे तळमजल्यावर जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.
शिरपूर, शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केलेली आहे. या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिल्याने या वर्षीपासून संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येणार
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठोबाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. तसेच कीर्तन, प्रवचन यांना उपस्थित राहण्यात खंड नसे. हे सर्व संस्कार संताजींवर झाले. तत्कालीन परंपरेनुसार अगदी बाल वयातच विवाह होत असत. संताजींचा विवाह त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षी खेडच्या कहाणे घराण्यातील यमुनाबाई यांच्याशी झाला.