Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे या संस्थेची स्थापना १०० वर्षापुर्वीची आहे. संस्थेच्या वतीने दर वर्षी गरीब विद्यार्थ्यांना रू. १०००/ - शिष्यवृत्ती दिली जात होती. मागील दहा बारा वर्षात शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आली होती.
संस्थेच्या वतीने सन २०१५ - २०१६ या शैक्षणिक वर्षापासुन शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. इयत्ता ११ वी ते पदवीपर्यत शिक्षण घेत असलेल्या तेली समाजातील गरीब विद्यार्थ्यांना रू. १०००/ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या नमुन्यातील अर्ज भरून त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदरचा अर्ज ३१ जुर्ल २०१५ पर्यंत खालील पत्यावर पाठविण्यात यावा.
श्री.संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुंदूंबरे तर्फे निषेध पत्र
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज या पालख्यांचे स्वागत संताजी ब्रिगेड व जयभवानी टेक्नीकल इंस्टीट्युटच्या वतीने करण्यात आले. येणार्या सर्व वारकरी बंधु आणी भगनींना ४००० बिस्कीट पुड्यांच वाटप करण्यात आले. संस्थेचे पुणे शहर अधयक्ष श्री. संतोषशेठ व्हावळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पुणे शहरात अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम हि संस्था राबवी असुन गरीब महिलांना मोफत साडी वाटप, मोफत शिलाई मशिन, मुलांचा गुणगौरव, जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार अरोग्य शिबीर मोफत शालेय साहित्य वाटप चष्मे वाटप असे अनेक प्रकारचे सामाजीक कार्य श्री. संताजी ब्रिगेड पुणे शहर आणि जय भवानी टेक्नीकल इंस्टीट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने राबीवले जातात.

वि. ल. भाव्यांनी आगदी ब्राह्मण समाजाचा कडाडून विरोध सहन करून संत संताजींच्या वह्या वरून पहिली संत तुकाराम गाथा मुद्रित केली याची जाणीव समाजाला झाली. आपल्या कडे सर्य आहे. आपल्या या सुर्याला काजवा बनविले आहे. याची जाणीव प्रथम कुणाला झाली असेल तर ती रावसाहेब विठ्ठलशेठ नारायण केदारी यांना मुंबईकर मंडळी ते एकत्र आले आणी सुदूंबरे येथे गेले येथील स्थानीक मंडळींनी पिड्यान पिड्या संभाळलेली दौलत म्हणजे संताजी समाधी या समाधी जवळ जाण्यास वाट नव्हती या परिसरात झाडे वाढलेली होती. रावसाहेब केदारी पहिले पुढे गेले. आणि त्यांच्या हाताने झाडे दुर केली. आणि मोजून २०/२५ बांधवांना साक्षीने पहिली पुण्यतिथी साजरी करणारे रावसाहेब होते.

एवढं वैभव दानधर्म, कुटूंबाचा गाडा, समाजातील प्रतिष्ठा ऑनररी मॅजिस्ट्रेट ते रावसाहेब किताब. कुठलाही वडिलोपार्जीत प्रॉपर्टी नसतांना कुणाचही पाबळ नसतांना स्वकष्टार्जीत पैशाने करणारे रावसाहेब दानशुर कर्णच होते.
ब्रिठीशांनी त्यांना रावसाहेब हि पदवी दिली असली तरी, ब्रिटीशांना काडीचाही सुगावा लागू न देता ते भारताच्या स्वातंत्रप्राप्तीसाठी राजकारणात पडद्या आडून सेवा करणारे ते स्वातंत्र्या सेनानीच होते तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आशा नामवंत राजकरण्यांच्या संपर्कात असणारे रावसाहेब राजकारणापासून दूरच होते.
वराहगिरी व्यंकटगिरी राष्ट्रपती असतांना श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना रावसाहेबांना पद्मश्री हा बहुमान देवून सन्मानीत करण्यात आले तो सोहळा अवर्णीय होता.