Sant Santaji Maharaj Jagnade
कोथरूड येथे सुरूवातीला श्री. संताजी जगनाडे महाराज तिळवण तेली समाज ट्रस्ट म्हणुन १९९३ मध्ये स्थापन करण्यात आला. या ट्रस्टची स्थापना होण्यापुर्वी सन १९९२ मध्ये तिळवण तेली समाज, ८२ भवानी पेठ येथील निवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी मी व श्री विजय भोज आम्हा दोघांना काही ट्रस्टींनी १९८६ ची मतदार यादी देऊन या भागातील समाजबांधवांना मतदनासाठी कार्यालयात येण्याचे सांगितले. त्यानुसारर मी आणि श्री. विजय भोज आम्ही दोघांनी मतदार यादीनुसार येथील प्रत्येक समाजबांधवाकडे जावुन मतदानासाठी कार्यालयात येणाचे आवाहन केले. परंतु मतदानासाठी आलेल्या समाजबांधवांनी कार्यालयात येऊन मतदार यादीत आपले नाव शोधले असतार एकाही समाजबांधवाचे नाव यादीत आढळले नाही.
संताजी फाऊंडेशनचे मुख्य उद्देश असा आहे की समाजातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन समाजाची उन्नती करणे एकमेकांना सहकार्य करणे, निकोप व समृद्ध समाज तयार करून जे उच्चशिक्षीत / विचारवंत समाज बांधव समाजापासुन दुर आहेत अशांना एकत्र समाज प्रवाहात आणणे व त्यांना समाजा साठी आपण काही तरी करावे अशी भावना त्यांच्यात जागृत करणे
सदरच्या संस्थेतील शिस्तबद्ध कामाचे नियोजन तसेच पदाधिकार्यांची सामाजासाठी असलेली आपुलकी सर्व घटकांना एकत्र आणण्याची प्रवृत्ती व समाजाचे जीवनमान कशा प्रकारे उन्नत करता येईल या बाबींची तळमळ मला जाणवली मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून या संस्थेत कार्यरत असलो तरी घेण्यात येणारे निर्णय हे सर्वानुमते घेतले जातात ही बाब उल्लेखनिय आहे.
संताजी फांऊंडेशन पुणे, ही तेली समाजातील एक सामाजिक जाणिव असलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना झाल्या पासून आजपर्यंत या संस्थेमध्ये मी काम करत आहे. संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. प्रकाशशेठ पवार यांच्या योग्य मार्गदर्शना खाली संस्थेचे कामकाज अतिशय सुरळीत पणे चालु आहे. संताजी फाऊंडेशन ही संस्था कोणत्याही प्रकारच आर्थिक सहाय्य न घेता स्वखर्चांने उच्चशिक्षितांचे वधु-वर मेळावे वर्षातून दोन वेळा आयोजित करते.
हडपसर : जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लेखक श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासात हडपसर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
दुपारी 3 वाजता शामराव भगत यांच्या निवासस्थानी पालखी सोहळ्याचे आगमन झाले.
या वेळी संताजी तेली समाज हडपसरचे पदाधिकारी प्रितम केदारी, कुंडलीक देशमाने, अप्पा किरवे, रमेश डाफे, श्यामराव भगत, सुनील क्षीरसागर व इतर कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले.
आलेल्या वारकर्यांसाठी व भाविकांसाठी महाप्रसदांचे आयोजन करण्यात आले होते.