Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 2)
![]()
श्री. धोंडीबा राऊत हे एक माळकरी व टाळकरी. शिक्षण जेमतेम झालेले जेमतेम शिक्षणावर पगार देणारी पोष्टमनची नोकरी करीत. तळेगाव दाभाडे ते चाकण रस्त्यावर इंदोरी हे बर्यापैकी गाव. या गावच्या बाजारपेठेत छोटेखानी घर सुदुंबर्याच्या काळे घराण्यातील त्यांची आजी व भक्ती करावयाची वंशपरागत तोच धागा त्यांच्याकडे आलेला.
( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
![]()
सर्व संतात तुकोबांना आपण कळस चढविला म्हणतो. तुकोबांचे अभंग माहीत नाहीत किंवा ऐकले नाहीत असा एकही मराठी माणूस सापडणार नाही. ही महाराष्ट्राची अनमोल ठेव आहे. या ठेवीवरच येथील समाज जीवन उभे आहे. ही ठेव प्राणपणास लावून जपणारे महान पुरूष म्हणून आपण संताजी महाराजांना ओळखतो इतिहास आपल्या पानावर हेच नमुद करत आहे. परंतु काही काळ असा होता की, सुदुंबरे या गावात एक पडकी समाधी हीच फक्त आठवण होती.
श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा विशेष अंक
82 भवानी पेठ पुणे (तिळवण तेली समाज कार्यालय) येथे. श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळात श्री. मोहन देशमाने लिखीत श्री. संत संताजी महाराज जगनाडे संपुर्ण इतिहासाचे पुस्तकाचे प्रकाशन पालखी सोहळ्यात करण्यात आले.
![]()
- मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र.
वि. ल. भावे. व संत संताजी यांचा संबंध काय ? आशा काही ज्या घटना आहेत हे जेंव्हा आपण अभ्यासू तेंव्हा संत संताजी यांचा संबंध काय ? अभ्यासू तेंव्हा संत संताजी समजण्याचा मार्ग सापडतो १८६० ते ७० दरम्यान संत तुकारामांच्या अंभंगांचे मोडीतून देवनागरी कारण करणे सुरू झाले. परंतु फक्त महिपती आपल्या लेखनात म्हणतात चाकणचा संतु तेली तुकोबासह अभंग लेखन करी परंतू या दरम्यानच्या मंडळींनी संत संताजी हस्ताक्षरातील वह्या मान्य केल्या नाहित. ही वाटचाल अशीच सुरू होती. परंतू वि. ल. भावे यांनी १९२० च्या दरम्यान फक्त संत संताजींच्या अभांगावरून तुकोबा गाथा तयार केली.
ह.भ.प. दहितुले बुवा मानव म्हणुन जगले. चार रूपये कमवुन देान रूपये इतरा साठी देत होते. अनेक गोर गरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत त्यांनी केली. अनेक मंदिरांना त्यांनी साह्य केले. मंदिरात मुर्ती दिल्या. गरिबांची लग्ने लावून दिली अडचनीत आलेल्या संसाराला हातभार लावला पंढरपूर येथे पालखी सोहळ्यास १४ गुंठे जागा घेण्या साठी उसनवार पैसेे दिले. पंढरपुर येथे संताजी मंदिर ही उभे केले. संत संताजी जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे ते काही वर्ष अध्यक्ष ही होते. गाणगापूर येथे जावून त्यांनी आश्रमाची उभारणी केली.