Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. गंगाधर का. हाडके, उपाध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा सदुुंबरे
त्यामध्ये सामील होण्याची संधी आपल्या समाजातील जेष्ठ समाज बांधव कै. श्री. दादा भगत पुणे कै. श्री. धोंडीबा राऊत व पोलिस खात्यांतील कै. श्री देशमाने यांनी १९७७ श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्यांची संधी अनंत अडचणीला तोंड देत उपलब्ध करून दिली. आणि आता हा पालखी सोहळा दिमाखांत श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्तगुरू श्री. संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळ्या बरोबर मार्गक्रमण करीत आहे.
पालखी निघाल्या नंतर ४/५ वर्षींनी मी पांच वारकरी घरी जेवणास बोलावत असे. नंतर ती प्रथा बंद झाली. परंतु सेवा म्हणुन ९१/९२ साली आमचा हिशोब करून देत जा आपण दिवानजी आहात व मार्केट मध्ये असल्यामुळे बहुतेक ट्रस्टी व्यापारी असल्या मुळे ओळख होतीच त्याचा उपयाोग व मी तिळवण तेली समाजाचा हिशोब तपासणीस व नंतर जा. सेक्रेटरी होतो. त्याचे माध्यमातून महाराजांची सेवा करायला मिळाली अध्यक्ष माधवराव आंबीके व नंतर मेरूकर अध्यक्ष झाले नंतर सन २००० पासुन माझी सेक्रेटरी म्हणुन नेमणुक झाली
श्री. ताराचंद देवराय
![]()
माझं १२ संपुन १३ व लागलेलं शाळेची सुट्टी संपुन शाळा चालु होण्याची लगबग नवीन कपडे, बुट, पुस्तक याचं आर्कषन अन घरात आपल्या संताजींची पालखी निघण्याची गडबड मी. आईला हट्टाला धरल मला पन पालखीला यायंचच. मी सारखा हट्ट धरला आई म्हणाली ती ह्यांना विचारेल आई आज विचारीन मग विचारीन माझी तगमग चालु होती. वडील माजघरात आल्यानंतर घरातल्या १, २ माणसांशिवाय त्यांच्याशी बोलायच हिंम्मत कोणालाही नव्हती. आईने विचारले आहो ह्या पोराला घ्याल का आपल्या बरोबर काही पडीलेली काम करील. वडीलांनी नाही म्हंटले
![]()
शेकडो वर्षा पासून पंढरपूरला पायी वारी करत विठ्ठल भेटीला जाण्याची परंपरा, वारकरी संप्रदायातील महान संतानी चालू केली. याच संतमंडळी मध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराज देहूकर यांच्या निकटच्या शिष्यांपैकी व १४ टाळकर्यां पैकी एक असलेले आमचे संत श्री. संताजी महाराज जगनाडे (चाकणकर) यांची सुद्धा सुदुंबरे ता. मावळ, जि. पुणे या समाधी स्थळा पासून पालखी सोळहा सुरू केला गेला.
![]()
तिळवण तेली समाजातील समाजहिताच्या गरजा लक्षात घेऊन पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात आज दि. ५/७/२०१५ चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पुणे येथे श्री. रमेश भोज यांच्या अध्यक्षतेखाली श्री. विजय रत्नपारखी, सौ. राधिकाताई मखामले, श्री. दिलीप शिंदे, श्री. संतोष व्हावळ, श्री. प्रीतम केदारी, श्री. महेश अंबिके, श्री. गणेश चव्हाण, श्री. अनिल उबाळे, श्री. राजू हाडके, श्री. संदीप चिलेकर, श्री. सचिन काळे, श्री. सूर्यकांत बारमुख यांनी एकत्र येऊन विचरविनिमय करून नवीन संघटना स्थापना करण्याचे एकमताने ठरविले.