Sant Santaji Maharaj Jagnade
मीटिंगच्या ठरलेंल्या विषयावर चर्चा वगैरे होऊन मीटिंग संपणार तोच राऊत उभे राहिले. आपली आहे ती ओळख सांगितली. संताजी महाराज यांची पालखी आपल्या संस्थेद्वारे पंढरपूर येथे जावी. याबाबत कार्यकारिणीने विचार करावा. मग यावर चर्चा सुरू झाली. वारकर्यांची मते होती तशीच कार्यकारीणीची मते होती. सर्वांनी बहुमताने त्यानी मांडलेला ठराव फेटाळला. राऊतांना दु:ख झाले. ही आपली मंडळी, पण हीसुद्धा साथ देण्यास असमर्थ आहेत.
![]()
आपण पुढे होऊन पालखी सुरू कशी करावी. हा ध्यास लागला. लोणंदच्यापुढे जात असताना बरड येथे मुक्काम होता. बरड गाव छोटेच पण या गावात अर्जुनशेठ बरडकर ही धर्मात्मा असामी. हा एकटा माणूस लाखो माणसांना दोन्ही हातानी मदत करणार, वारकरी तृप्त होत. बरड येथे गेल्यावर अर्जुनशेठना सांगावे वाटले. पण कसे सांगावे आपण हे असे ! बरडकर हे असे ! त्यांना सांगावे, का न सांगावे याच विचारात सांगावयाचे राहून गेले.
श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 3)
![]()
पुण्याच्या कस्तुरी चौकाला इतिहास आहे. या चौकातच बराच लांब पसरलेला भगतांचा वाडा. या वाड्यातले रत्नाकर उर्फ दादा भगत म्हणुन परिचित साने गुरूजींच्या चळवळीत वाढलेले. सामाजिक कार्याची आवड व धडपड असलेले. सुदुंबर्याच्या उत्सवात हिररीने पुढाकार घेणारे. घराजवळच्या विठोबाच्या मंदिराची सेवा करणारे असे श्रद्धावान गृहस्थ. त्यांच्याच पूर्वजांनी जंगली महाराज मठ उभारण्यात पुढाकार घेतलेला.
श्री संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ : इतिहास (भाग 2)
![]()
श्री. धोंडीबा राऊत हे एक माळकरी व टाळकरी. शिक्षण जेमतेम झालेले जेमतेम शिक्षणावर पगार देणारी पोष्टमनची नोकरी करीत. तळेगाव दाभाडे ते चाकण रस्त्यावर इंदोरी हे बर्यापैकी गाव. या गावच्या बाजारपेठेत छोटेखानी घर सुदुंबर्याच्या काळे घराण्यातील त्यांची आजी व भक्ती करावयाची वंशपरागत तोच धागा त्यांच्याकडे आलेला.
( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
![]()
सर्व संतात तुकोबांना आपण कळस चढविला म्हणतो. तुकोबांचे अभंग माहीत नाहीत किंवा ऐकले नाहीत असा एकही मराठी माणूस सापडणार नाही. ही महाराष्ट्राची अनमोल ठेव आहे. या ठेवीवरच येथील समाज जीवन उभे आहे. ही ठेव प्राणपणास लावून जपणारे महान पुरूष म्हणून आपण संताजी महाराजांना ओळखतो इतिहास आपल्या पानावर हेच नमुद करत आहे. परंतु काही काळ असा होता की, सुदुंबरे या गावात एक पडकी समाधी हीच फक्त आठवण होती.