Sant Santaji Maharaj Jagnade

महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- कोल्हापुर जिल्हा प्रांतीक महासभेचे अध्यक्ष शिवाजीराव माळकर सह इतर १५ पदाधिकारी उपस्थीत होते. माळकर सर हे निवृत्त प्राचार्य असुन सद्या ते महत्वपुर्ण शिक्षण संस्था चालवतात तसेच ते अनेक शिक्षण संस्थावर पदाधिकारी असल्यामुळे कोल्हापुर प्रांतीक महासभेची वाटचाल आशादायी आहे. जिल्ह्यातील लिंगायत तेली समाजाचे महत्वपुर्ण पदाधिकारी सुनिल सावर्डेकर सह सह पांडुरंग वडगांवकर, गणेश वाळवेकर, मोहन फल्ले आदी अनेक पदाधिकारी आवर्जुन बैठकीस उपस्थीतीत होते.
जिल्ह्यातील तीन तालुक्यातुन आमदार पदासाठी तेली समाज तिकीट मागु शकतो अशी परिस्थीती आहे. स्वत: किसन घोडके भाजपा मधुन आमदार की साठी उत्सुक असुन पुढील काळात समाजाचे वतीने तिकीट मागणीसाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येईल
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- सांगली जिल्ह्याचे डॉ. संजय गताडे यांनी सांगीतले की, तालुका व जिल्हा पातळीवर सामाजाची संपर्क कार्यालये असावीत तेथुन सर्वसामान्य समाजबांधवास देखील महाराष्ट्रात कुठेही पदाधिकार्यांशी संपर्क साधता यावा. समाजाने हायटेक व्हावे.
सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सुरेखा हाडके यांनी आपला अहवाल मांडताना नमुद केले की, समाजातील पुरूष मंडळींनी महिलांना देखील समाजकार्य करण्याची समान संधी द्यावी. संघटनेच्या कार्यात महिलांचा दिवसेंदिवस सहभाग वाढत असुन लवकरच शिरवळ तेथे महिलांचा विभागीय कार्यक्रम घेण्याचा विचार चालु आहे.
- पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र
परंतु १५ वर्षा पुर्वी महाराष्ट्र तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष पद मिळाले हे मिळाल्या नंतर या पदाला न्याय देणे हे ठरवून ते महाराष्ट्रात फिरू लागले. प्रवास, निवास जेवण हे स्वत: करत सुदुंबरे व नागपुर येथिल महामेळावे भरवणे हे अवघड धनुष्य खांंद्यावर घेतले. ते घेताना समाज ढवळून काढण्यासाठी त्यांनी जिल्हा तालुका व गावे पिंजुन काढली किमान चार लाख बांधव हजारो मैलावूरन सुदूंबरे येथे घेऊन येण्याचे दिव्य त्यांनी यशस्वी केले. या झुंजीत लाखो रूपये गेल. पण मागे सरले नाहीत. परंतु महामेळाव्याद्वारे महाराष्ट्रातील बड्या राजकरण्यांची झोप उडवली हा अफाट समाज जर असाच जागा होऊन संघटीत झाला तर आपले राजकारण तेल्याच्या वळचनीला जाईल. या वेळी काही हुशार मंडळींनी तेली आडवा तेली हटवा हा अघोषीत अजंठा राबवला. मी तेली आहे. आणि तेली म्हणुनच निवडून येतो हे ठसवणारे रामदासजी तडस यांच्यासाठी मोर्चे बांधणी केली. त्यातुन आमदारकीत अपयश दिले. हे अपयश खिशात ठेवून ते समाज पिंजुन काढत होते. ते करिताना घराला घर पण देणारी जवळची ५० एकर जमीन घरापासुन दुर गेली हे शेवटी समजले पण ते डगमगले नाहीत हीच त्यांची तेली निष्ठा.