Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजातील महान विभुती (भाग 1) सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
जोगा परमानंद
संत नामदेवांचे गुरू म्हणुन प्रसिद्ध असलेले महापुरूष भाई जोगा परमानंद. हे तेली ज्ञातीतील होते. संत नामदेवांच्याआधी त्यांनी उत्तर भारताचा दौरा केला होता. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिब या धर्मग्रंथात त्यांच्याही काही रचनांचा समावेश आहे. जोगा परमानंद हे अतिशय उच्च दर्जाचे कवी होते.
औरंगाबाद माजी ऊर्जामंत्री, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर संधी देऊन तेली समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व तेली सेनेतर्फे गडकरींना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त नगर शहरात दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने परिपत्रक काढून संताजींची जयंती उत्सव साजरा करण्याचे सूचित केले असून ही बाब समाजाच्या दृष्टीने उत्सवाचा आनंद व्दिगुणीत करणारी आहे. तरी समाजातील तिळवण तेली समाज ट्रस्ट, जिल्हा तेली समाज महासभा,श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट, श्री संताजी विचार मंच, श्री.संताजी महिला मंडळ, श्री.संताजी नागरी सहकारी पतसंस्था व समाजातील बांधवानी यात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती करण्यात आली आहे.
साई संताजी प्रतिष्ठान शिर्डी अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा शनिवार दिनांक 12-10-2019 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सिद्धी संकल्प लॉन्स मंगल कार्यालय नगर मनमाड हायवे साकुरी तालुका राहता शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर वधू-वर पालक परिचय मेळावा पूर्णतः मोफत आहे. संपर्क कार्यालय व फॉर्म शिकण्याचा पत्ता साई संताजी प्रतिष्ठान होटेल एक्झिक्युटिवे इंन युनियन बँकेच्या वर गोंदकर पेट्रोल पंपासमोर नगर मनमाड हायवे शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर 9890279008, 9422191544, 7972147109
आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात.