1942 मध्ये महामा गांधींनी करेंगे या मरेंगेचा संदेश दिला. भारत छोडो ही गर्जना नगरच्या तेली खुंटावर दिली. तेली खुंट हा नगरच्या मध्यवर्ती परिसर. ही गर्जना नगर शहराल पसरली. अनेक स्वातंत्र्सैनिकांच्या ग्रुप्त बैठका दारूणकर यांच्या येथे होत. रोज सकाळी प्रभात व सायंकाळ सायंफेरी दारूणकर सोबत्यांना बरोबर घेऊन काढत असत. हातात तिरंगा व मुखाने नही रखनी नही रखना यह जालिम सरकार नही रखना हा आवाज उमटु लागला. इंग्रजांचे लक्ष दारूणकरांच्या कडे वळले. त्यांनी साम, दाम, दंड यांचा वापर केला. परंतु आवाज बंद होत नव्हता. उलट तिरंगा घेऊन ते इंग्रजांना सळो की पळो करीत होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना आटक केली. येरवडा जेल मध्ये रवानगी केली. या ठिकाणी एस.एम.जोशी, आच्युतराव पटर्वशन या सारख्य बरोबर शिक्षा भोगताना त्यांना आनंद होत होता. सहा महिण्याची शिक्षा भोगल्या नंतर त्यांनी सावध राहुन गुप्त पणे स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवला.
डॉ. अमोल वसंत भांडकर :- पाथर्डीच्या वसंत भांऊचे हे डॉ. अमोल चिरंजीव हे मुळात एम.डी. पदवी मिळवलेले आहेत. विमान नगर परिसरातील दर्जेदार हॉस्पीटल मध्ये ते एक तज्ञ डॉक्टर म्हणुन ओळखले जातात. वडगांव शेरी येथिल पाण्याच्या टाकी जवळील सुंदराबाई हायस्कुल समोर स्वत:चा सुसज्य दवाखाना आहे. स्वत: स्किन स्पेशालीस्ट आहेत. नैसर्गीक केसा सारखे ते केस रोपन ही करतात कै. बबनराव भांडकर व श्री. वसंत भांडकर यांची समाजसेवेची एैतिहासिक परपंरा ही चालवत आहेत. पुण्या सारख्या शहरात स्क्रीन स्पेशालीस्ट कमी आहेत यात यांचा पहिल्या पाच मध्ये नंबर लागतो.
श्री. जगन्नाथ चंद्रभान लुटे यांचा जन्म श्रावण शुद्ध पंचमी शके दि. 25/08/1933 रोजी येवला , जि. नाशिक येथे झाला. त्यांचे मुळ गाव वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक हे असून, त्यांचे बालवाडी चे शिक्षण आळंदी येथे झाले. त्यानंतर त्यांनी वावी येथे शेतकरी शाळेमध्ये चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे चौथीनंतरचे शिक्षण तेली संताजी बोर्डींग नाशिक येथे झाले.
1947 साली वडीलांच्या निधनानंतर वावी येथे त्यांच्या काकांनी त्यांना मुळ किराणा व्यवसायामध्ये उतरवले. त्यानंतर 1949 साली त्यांच्या काकांचे ही निधन झाले. अर्थात त्या नंतर सर्व कुुटुंबाची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. त्या दरम्यान त्यांचा मुळ व्यवसाय असलेल्या किराणा दुकानावर इन्कमटॅक्स व सेलटॉक्सच्या केसेस दाखल झाल्या. त्या कारणावरून त्यांना आपले दुकान बंद करावे लागले.
आठवडे बाजाराचे रूपांतर केले दिवटेंनी मॉल संस्कृतीत
पिड्यान पिड्या जोपासलेला तेल घाना घानवडीतुन उपसुन बाहेर ठेवण्याची वेळ आली तेव्हां समाजबांधवांनी पर्याय शोधले. यातील एक पर्याय म्हणजे भुसार मालाची ठोक खरेदी विक्री, गावात शहरात किराणा दुकान, अल्प भांडवलावर परिसरातील आठवडे बाजारात पाल ठोकुण किराणा माल विक्री. या आठवडे बाजारातुन अनेकांनी नंतर झेप जरूर घेतली आहे. परंतु आठवडे बाजार करता करता मॉल संस्कृतीला आपले करून त्या व्यवसायात मांड ठेवून वावरणारे कोणच मला भेटले नाही. हि सत्य बाब जवळ असताना या माझ्या सत्याला मान्य करता येणार नाही अशी वाटचाल संगमनेर येथील दिवटे परिवाराने करून दिली. त्यांच्या या वाटचालीचा मागोवा.
देडगांव ता. नेवासा हे मुळ गाव सन 1993 मध्ये त्यांनी आपले गाव सोडले ते कोरगाव येथे आले. सुरवातीस छोटे मोठे उद्योग करू लागले. या नंतर रिअल इस्टेट उद्योग निवडला. या उद्योगाला चांगला जम बसविला याच जोडीला समाज सेवेची आवड. तुळजाभवानी तरूण मंडळाची सुरूवात केली. जय संताजी युवक संघटना सर्वांना बरोबर घेऊन सुरू केली. श्री. संताजी पुण्यतिथी साजरी केली जाते.