Sant Santaji Maharaj Jagnade
‘‘ मी रत्नाकर भगत बोलतोय. हे बघा रात्री जो प्रकार घडला तो घडावयास नको होता. पण समाजाच्या विचाराला अनुसरून मला थांबावे लागले. आपण गेल्यानंतर रात्रभर मला या गोष्टीने चैन पडले नाही. यावर साधकबाधक विचार केला. रात्री मीही हिरिरीने बोलणे गरजेचे होते. याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. रात्री आपण म्हणता त्या मार्गाने पालखी काढू. त्यासाठी कडक होण्याची तयारी आहे. उद्या सकाळी तुमच्याकडे येतो. ‘‘ दादा
त्यासाठी दादांनी लोकांना कळवावे. यानंतर सकाळ पेपरमध्ये संत संताजी पालखीसंबंधी जाहिरात द्यावी. सकाळमध्ये जाहिरात घेऊन दादांनी समाजाची बैठक बोलविली. त्या दिवशी त्या बैठकीला समाजातील पुण्यातील प्रतिष्ठित तीस एक लोक हजर होते. यात लष्करमधील सर्वश्री प्रधान, ताराबाई सुपेकर, अंबादास शिंदे, व्यवहारे बाबा, रामचंद्र शेजवळ, तळेगाव दाभाडे येथील बाळासोा बारमुख आणि इतर मंडळी हजर होती.
पालखी विषयी दोघांनी जो वेगवेगळ्या मार्गाने विचार केला तो त्यांनी एकमेकाला सांगितला. विचारांची देवणाघेवाण झाली. एकमेकातल्या उणिवा दूर झाल्या राऊतांची पूर्ण खात्री झाली. हा माणूस नुसता बोलघेवडा नाही. आपल्या प्रमाणे अभ्यास केलेला आहे. हाच माणूस खात्रीशीर सहकार्य करेल. पालखी तुकोबाच्या मागे नेली तर येणार्या अडचणी ह्या माऊलीच्या मागे जाण्यापेक्षा जास्त आहेत. तेव्हा माऊलीबरोबर जाण्यातच हित आहे. पण तरी चौकटीआतील बोलणी. उद्या माघार नको. एकमेक कुठे तरी बांधले पाहिजे.
![]()
कार्यरत विश्वस्त मंडळ २०१५
सर्व समाजबांधवांना कळविण्यात येते की, श्री संताजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील समाजातील सर्व पदवीधर व प्रोफेशनल व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व समाजबांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या कुटुंबातील डॉक्टर, वकील, इंजिनीअर, पोलीस खात्यातील, शासकीय अधिकारी इतर क्षेत्रातील उच्च पदावर नुकतीच नियुक्ती झालेल्यांची माहिती खालील मोबाईल क्रमांकांवर पाठवावी, त्यांचा उचित सन्मान आम्ही करू इच्छितो.