Sant Santaji Maharaj Jagnade
चिंचवड :- ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटने तर्फे हे साहित्य संमेलन 4 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 9.30 ते सायं 7 वाजेपर्यंत चैतन्य सभागृह चिंचवड येथे संपन्न होईल. ओबीसी समाजाचा संस्कृतीक शोध, ओबीसींवर होणारा अन्याय या बाबत विचार प्रकट केले जातिल.
पौड :- या तालुक्याच्या गावच्या ठिकाणी पुर्वी पासुन समाजाचा सत्तेत सहभाग आहे. सरपंच, पाटीलकी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य समाजाचेच आहेत. परवा झालेल्या ग्रा. पं. निवडणीकीत समाजाचे तिन सदस्य विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत समाज बांधव श्री वाल्हेकर हे विजय झाले आहेत. त्यांचे अभिनंदन पौंड समाज बांधवा तर्फे केले आहे. सर्वा तर्फे पुन्हा अभिनदन.
मुद्रण कला अस्तीत्वात आली. एक पिढी कडे हास्तलिखीते जाण्याची पद्धत धोक्यात आली. हस्तलिखीते हास्तांतरीत होताना काही बदल होत. शेकडो वर्षानी नुसता मुळ गाभा गेला ही आसे आशा वेळी मुद्रण कला आली. महात्मा फुल्यांनी त्या काळात संस्कृतीला विकृत करून जगणार्यांना फार मोठा हादरा दिला पण हार न माणनारी ब्राह्मण्य जमात आपल्या पराभवातून ही उदयाची वाट सुधारत आसते.नेमके या वेळी आनेक हस्तलिखीते मुद्रण करताना सोईचे बदल केले.
जेवणावळी, ओळखी, नाते संबंधात संपर्क, भाषण बाजी या परिघा बाहेर समाजाचे कार्यक्रम जात नाही. मानपान, प्रसिद्धीचा ढोल श्रिमंतीचे प्रदर्शन मोठे पणाची हौस मिरवणे, यातुन मतभेद ही या कार्यक्रमांची कार्यक्रम पत्रिका आसा हा कार्यक्रम संपल्यानंतर दुसर्या शहराच्या कार्यक्रमा पर्यंत शांतता. कारण इथे मी हेच आसते. कारण इथे पळवाट ठेवुन वावरणे आसते कारण इथे खरा संघर्ष कोणाबरोबर आहे. याची साधी जाणीव ही दिलेली नसते. त्यामुळे संघर्ष होत नसतो. संघर्ष नसल्यामुळे इथे समाजाच्या आणि त्यांचया ही पदरात काहीच पडत नसते.
माझी बातमी माझा फोटो एवढेच वाचन करणारे आता बांधव वाचन करू लागले. आपली मते बनवु लागली. ही परिवर्तनाची वाट निर्माण झाली. कारण तेली गल्ली मासिक मिळताच त्यातील लेख वाचन करून आपली परखड मते शेकडो. बांधव देतात. ही आता जमेची बाजु समाजात निर्माण झाली त्या बद्दल सुज्ञ बांधवांचे आभार. तेली समाज सेवक मासिकात युवकांचे चिंतन शिंबीर व संपादकीय लेखात श्री. भगवान बागुल यानी बर्याच गोेष्टी मांडल्या आणि त्या मांडताच मासिकाचे संचालक मंडळ चुळबुळ करू लागले. त्यातील हायकमांडला प्रश्न पडला तेली गल्ली मासिकात जे येते ते ठिक पण आपल्याच मासिकात त्या पद्धतिने येणे ठिक नाही. परंतु याच वेळी बागुलांना बर्याच बांधवांनी अभिनंदन पर मते कळवली. याचा अर्थ एकच हाय कमांडला समाजाच्या खर्या समस्या घेऊन संघर्ष करावा लागेल. ही वास्तवता समोर आली. श्री. बागुल सरांनी आपल्या लेखात एक शब्द प्रयोग वापरला प्रथम त्यांचे अभिनंदन करतो. तो शब्द प्रयोग आसा पुरे झाले वांझोटे कार्यक्रम. परत आपन या सर्वांचा समाचार घेऊ. आपल्या वेदनांचा मागोवा घेऊन तेली बलवान करू.