Sant Santaji Maharaj Jagnade
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 3)
मी सुरूवातीलाच मांडले मत असावीत या मतातुन संघटना उभी रहाते. सन 2010 पुर्वी जे मोजके शिलेदार खा. तडस साहेबाकडे होते त्यांना केशरकाकुंचे मार्गदर्शन होते. त्यांच्या विचाराचा प्रभाव होता तडस साहेबांची संघटन प्रणाली होती. पुण्या सारख्या परिसरात शेकडो जन यात झोकुन देऊन उभे होते. त्यांचे नेतृत्व आकाराला येऊ लागले होते. पण पुढील वाटचालीत यातील बरीच वयोवृद्ध झाले काहींना निर्णय प्रक्रिये पासुन दुर ठेवले. काहींना घरचा रस्ता दाखवला गेला. याच ठिकाणी नाराजीची लागन मुळ धरू लागली.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 2)
स्वातंत्र्याच्या पहिल्या काळात देशात विखुरलेल्या तेली समाजातील अनेक पोट शाखा एकत्र आल्या त्यांनी तैलिक संघटना स्थापन केली. उद्देश काय तर समाजाचे सामाजीक संघटन व्हावे सामाजीक सांस्कृतीक प्रश्न मिटावेत. या साठी दिल्ली येथे मुहर्तमेड रोवली.. त्या काळात दिग्रज येथिल कै. माधवराव पाटील आमदार होते. त्यांनी देशपातळीवरील पदाधीकार्यांना बोलावून महाराष्ट्रभर परिषद्या लावल्या दुर्देव आसे विदर्भ वगळता याला जनाधार मिळाला नाही. पण जेंव्हा समाजमाता कै. केशारकाकु यात सामिल झाल्या तेंव्हा बर्याच बांधवांना त्यांनी याची गरज पटवुन दिली. मा. खा. शांताराम पोटदुखे यांची साथ ही मिळाली. आणी तैलीक महासभेचा पाया त्यांनी इथे निर्माण केला. त्या वेळी त्या खासदार होत्या. आशा वेळी अहमदनगर येथील सभेत त्यावळचे आमदार श्री. रामदास तडस हे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. तरूण नेतृत्व त्यात खेळाडु. संघटन कसे बांधावे याची प्रत्यक्ष अनुभवातुन जाणिव. हेवे दावे आपण मिटवायला आहो ही जिद्द. समाज जागा झाला पाहिजे ही धडपड. आपल्या साध्या शब्दाने ही समाज विस्कटु शकतो. ही नजर. या नजरेत आम्ही कुठे चुकलो किंवा समाजातील सामान्य बांधवांने जी चुक समोर आणली तर ती प्रांजळ पणे मान्य करून सुधारणे ही पैलवानी प्रकृती.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 1)
कोणत्या ही संघटनेच्या वाटचालीत अव्हाने असावीत सोबतीला वादळे ही असावीत. त्या संघटनेच्या वाटचाली बद्दल चर्चा व्हावी, त्या संघटनेच्या यशा बरोबर अपयशाचा आराखडा उभा केला जावा. त्या संघटनेच्या पदाधीकार्यांच्या धोरणा बद्दल कौतुक ही व्हावे तेवढेच चुका बद्दल चर्चा ही व्हावी. आणी नुसतीच भाटगीरी असेल तर ती संघटना ही हुकूमशाहीच्या बाजुने वाटचाल करून कायमची उभी रहाते किंवा नामशेष होत आसते. हा इतिहास आसल्या कारणाने तैलिक संघटने विषयी जे सध्या वादळ उभे राहिले तेंव्हा या बद्दल जनमानसात जे चालले आहे ते मांडत आहे. मान, पद मिळविण्यासाठी, मग ते पद टिकवण्यासाठी, मग मला का हाकलुन लावले या साठी. मी म्हणतो तेच सत्य किंवा सत्य असेल ते माझे ही वृत्ती न रहाता स्व केंद्रित जी वृत्ती बोकाळलेली आहे.
जय संताजी प्रतिष्ठाण बिड, आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारोह
शुभहस्ते :- मा. आ. श्री. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष - अखिल भारतीय तैलीक महासभा तथा उपगट नेते राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा.
प्रमुख उपस्थिती
मा. श्री. रविंद्रजी (दादा) क्षीरसागर, चेअरमन - गजानन सह. सा. का. राजुरी न.
मा. श्री. डॉ. योगेशजी क्षीरसागर, युवा नेते
मा. श्री. हेमंतजी क्षीरसागर, युवा नेते
मा. श्री. अर्जुनजी क्षीरसागर, युवा नेते
सौ. कविता यशवंत भागवत ग्रा. पं. सदस्या.
बदतापुर - अकोले तालुक्यातील बेलापुर (बादगी) या येथिल ग्रामपंचायत सदस्य पदी नुकतीच निवड झाली आहे. बेलापुर समाजबांधवा तर्फे त्यांचे अभिनंदन.