Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री. रविंद्र बाबूराव कर्डीले तेली समाजाचे आधार स्तंभ

    ओतुर ता. जुन्नर या बाजार पेठेच्या गावात. रविशेठ या नावाला जशी किंमत तशी समाज पातळीवर ही आहे. कै. बाबुराव कर्डीले यांनी कष्टावर दोन मुले डॉक्टर केली. याच वेळी शिक्षणाची उमेद घेऊन रवींद्र शेठ शाळेत जात होते. शाळेची पुस्तके ही प्रगती पथावर घेऊन जात होते. परंतु भावांचे शिक्षण पुर्ण झाले पाहिजे ही वडीलांची इच्छा. या इच्छे मुळे वडिला बरोबर व्यवसायात रमु लागले. जवळ फक्त शिक्षण दहावी पास. या बळावर ते व्यवसायात शिरले. पुस्तकी ज्ञाना पेक्षा शिक्षणाची मोठी शाळा आसते भाकरीची शाळा. या शाळेत ते हळु हळु उभे राहु लागले यातूनच पहाता पहाता जीवनाच्या शाळेत ते पिएचडी पर्यंत शिक्षण घेऊ शकले.

दिनांक 10-02-2016 20:03:26 Read more

बाजार बुनग्यांचे राजकारण नाय र बाबा.

स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 4)  -  मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे

    नगर जवळील भिंगार भींगारची वेस त्या वेशीजवळ भाऊसाहेब पतकी यांचे घर या घराजवळ क्षिरसागर यांचे घर घर कसले तर मातीने सारवलेल्या भिंती त्याावर गंजलेले पत्रे. दोन तीन पातीली एक तेलाचा डबा त्या जवळ बसलेले वयोवृद्ध क्षिरसागर. मी त्यांना जेंव्हा पाहिले तेंव्हा या स्वातंत्र्याची किव करावी वाटली. या स्वातंत्र्य वीराने इंग्रज अधीकारी गोळीबार करतोय म्हणून ती गाडीच उलथी पालथी केली. या पैलवान बांधवाचे पायच कायमचे निकामी केले. शिक्षा भोगावी लागली स्वातंत्र्यात मिळाले काय तर हे बुड टेकत चालणे. मी समाजातील स्वातंत्र सैनिकांचा इतिहास गोळा केला. त्यांचे पुस्तक ही प्रसिद्ध केले. पण यातील बर्‍याच जनांच्या घरात आपल्यात स्वातंत्र्य सैनक होते याची जाणीव पुसट होत चालली आहे. त्या घरात ही अवस्था तर समाजाला किती जाणीव असावी.a

दिनांक 29-08-2016 21:46:13 Read more

मुख्यमंत्री झाले तेली मतावर देवेंद्र फडणवीस ?

काँग्रेसची गाडी गेली, भाजपाची निघाली, तेली समाजाचे वाजले की बारा !!! ( भाग- 4 )  -  मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

         आणी 25 ते 0 टक्के प्रत्येक मतदार संघात विदर्भामध्ये तेली मतदार असल्याने लोकसभेत तेली मते निर्णायक ठरली. हीच रणनीती विधान सभेसाठी वापरुन विदर्भात भाजपा विजयी होऊ शकाला. मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांच्याच मतदार संघात तेली मतदान हे 35 ते 40 टक्के आहे. ही सर्व एक गठ्ठा मते फडणवीसांनाच मिळाली आहेत. या तेली समाजाने मते दिली म्हणुन भाजपा व फडणवीस सत्तेत गेले. गत वर्षात समाजाला काय दिले ? हा प्रश्‍न विचारणे समाजाचा अधीकार आहे. ओबीसी विद्यार्थींना ना फी दिली ना तेली समाजासाठी नविन विकास महामंडळ स्थापन केले. ना तेली सक्षम होईल अशी धोरणे राबवली. कायद्याच्या पळवाटा शोधून

दिनांक 20-01-2016 23:41:57 Read more

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते ग्राम पंचायत सदस्य

काँग्रेसची गाडी गेली, भाजपाची निघाली, तेली समाजाचे वाजले की बारा !!! ( भाग- 3 )  -  मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

      एका सरपंचाचा दिवसा ढवळ्या खुन. एका नगरसेवकाचा दिवसा खुन. या बाबत नेते म्हणुन घेणार्‍यांनी आज पर्यंत कुठे ब्र काढला नाही. प्रश्‍न स्थानिक आहे. मध्यंतरी मोदी यांची ही पडद्या मागुन जात रस्तयावर आणली होती. इकडे विरोधा पेक्षा अभिमानाने सांगतो मोदी तेली आहेत. या पुर्वी आठवले यांचे उदाहरण याच साठी दिले. त्यांचया धोरणा विषयी माझी काही मते जरूर आहेत. पण त्यांनी जे साध्य केले त्या विषयी मते नाहीत. नुसतीच भाटगीरी करून काय मिळवले ? आज ओबीसी आरक्षणा विषयी भागवतासह काही जन जे बोलतात आज न्याय पालिकेचे एक न्यायधीश मत मांडतात देशाला भ्रष्ट्राचार व आरक्षण ही किड आहे. ही बोलण्याची ताकद 12 टक्के तेली समाजाने दिली. 

दिनांक 20-01-2016 23:33:32 Read more

बारा टक्के तेली समाजाच्या मतदानाचे वाजले की बारा ?

काँग्रेसची गाडी गेली, भाजपाची निघाली, तेली समाजाचे वाजले की बारा !!! ( भाग- 2 )  -  मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

             स्वातंत्र्य लयास घालवतांना बर्वे नावाच्या व्यक्तीने स्वराज्याचा ध्वज उतरवुन युनियन जॅक फडकवला. सातरच्या गादीवर लक्ष देण्यास याच बर्वेंना पाठविले. काही वर्षात छत्रपतींना देशो धडीस लावणारे हेच बर्वे होते. हा इतिहास आहे. तो कोणत्याच शालेय अभ्यासक्रमात येऊ दिला जात नाही. हे का मांडायचे तर या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भिल्ल, सोनार, रामोशी, कोळी या मंडळींनी पेशवाई संपुष्टात येताच प्रखर लढा दिला. यातील हजारो जनांना गोळ्यांच्या वर्षावात मरण इंग्रजांनी दिले. त्यांचा ही इतिहास कुठे शिकवला जात नाही. संत संताजी, नमाजी माळी, गवार शेठ या सारख्या मंडळींनी संत तुकोबा बरोबर राहून शिवराया साठी ही भुमी अनकुल केली. परंतु इतिहासाची फारकत घेऊन संत रामदासांना शिवरायांचे गुरु बिंबवले जाते.

दिनांक 20-01-2016 23:23:37 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in