यावर दादा व राऊतांनी विचारविनिमय केला. पालखी ही समाजाची आहे आपणा दोघांची नाही पण तरीसुद्धा सुरूवातीला कोणीच सहकार्य करणार नाही. तेव्हा जो खर्च होईल तो दोघांनी निम्मा निम्मा सोसावा. आणि पालखी सुरू करताना येणार्या अडचणी यावर विचारविनिमय झाला. पालखीसाठी बैल, रथ व पालखी या गोळा करण्याची जबाबदारी दादांनी घेतली. पालखी मावळात एका खेडेगावात होती. बरडचे अर्जुनशेठ यांची गाडी पुण्यात आली होती.
‘‘ मी रत्नाकर भगत बोलतोय. हे बघा रात्री जो प्रकार घडला तो घडावयास नको होता. पण समाजाच्या विचाराला अनुसरून मला थांबावे लागले. आपण गेल्यानंतर रात्रभर मला या गोष्टीने चैन पडले नाही. यावर साधकबाधक विचार केला. रात्री मीही हिरिरीने बोलणे गरजेचे होते. याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. रात्री आपण म्हणता त्या मार्गाने पालखी काढू. त्यासाठी कडक होण्याची तयारी आहे. उद्या सकाळी तुमच्याकडे येतो. ‘‘ दादा
त्यासाठी दादांनी लोकांना कळवावे. यानंतर सकाळ पेपरमध्ये संत संताजी पालखीसंबंधी जाहिरात द्यावी. सकाळमध्ये जाहिरात घेऊन दादांनी समाजाची बैठक बोलविली. त्या दिवशी त्या बैठकीला समाजातील पुण्यातील प्रतिष्ठित तीस एक लोक हजर होते. यात लष्करमधील सर्वश्री प्रधान, ताराबाई सुपेकर, अंबादास शिंदे, व्यवहारे बाबा, रामचंद्र शेजवळ, तळेगाव दाभाडे येथील बाळासोा बारमुख आणि इतर मंडळी हजर होती.
पालखी विषयी दोघांनी जो वेगवेगळ्या मार्गाने विचार केला तो त्यांनी एकमेकाला सांगितला. विचारांची देवणाघेवाण झाली. एकमेकातल्या उणिवा दूर झाल्या राऊतांची पूर्ण खात्री झाली. हा माणूस नुसता बोलघेवडा नाही. आपल्या प्रमाणे अभ्यास केलेला आहे. हाच माणूस खात्रीशीर सहकार्य करेल. पालखी तुकोबाच्या मागे नेली तर येणार्या अडचणी ह्या माऊलीच्या मागे जाण्यापेक्षा जास्त आहेत. तेव्हा माऊलीबरोबर जाण्यातच हित आहे. पण तरी चौकटीआतील बोलणी. उद्या माघार नको. एकमेक कुठे तरी बांधले पाहिजे.
आल्या पावली राऊत गेले ठीक आहे. परत येऊ इतके दिवस धडपडलो त्यांचे फळ जवळ आले. एकंदरीत माणूस निष्ठावान मिळाला घरातील आईसुद्धा भक्ती संप्रदायातील. या माणसाची या पुर्वी भेट झाली असती तर पालखी यापूर्वीच सुरू झाली असती. दुसर्या रविवारी पुन्हा राऊत दादांच्याकडे गेले. दादा घरात नव्हते राऊत निराश झाले. मी येणार हे सांगूनसुद्धा ते थांबले नाहीत याचे दु:ख मनात साचले. या रविवारी राऊत येतो. कोठे जाऊ नका. असा निरोप ठेवून ते गेले.