माऊलीबरोबर जाणार्या लाखो माणसांचा समुद्र. त्यांना पोटभर जेवण देण्याचे काम हे अर्जुनशेठ करीत. हा लैकिक अनेक वर्षांचा. पालखी निघणार ही गोष्ट दादा भगतांच्या करवी समजली होती. पालखी मावळातून आणण्यास त्यांनीच टेम्पो दिला होता. आणि कार्यकर्त्यांना आशीर्वादही. पालखी बरडला येणार हा आनंद त्यांच्या चेहर्यावर मावत नव्हता
पालखी वाल्ह्याच्या मार्गाला लागली. वाल्हे या ठिकाणचे पवार व इतर समाजबांधव स्वागताला गावाबाहेर उभेच होते. स्वागत व पूजन केले. संध्याकाळी दमलेल्या बांधवांना जेवण दिले. सकाळी गरम पाणी आंघोळीला दिले. चहापाणी झाल्यावर विश्वनाथ सोपान, विष्णु, सुरेश यांनी पालखी शिवराम पवार यांच्या घरी आणली दत्तात्रय तुकाराम पवार इ. मंडळींनी पालखी गाव वेशीपर्यंत नेली या मुक्कामात पुन्हा चार वारकरी आमच्यात आले.
शेवटच्या टोकाचे हे बोलणे एैकल्यावर बसलेल्या सर्व मंडळींना माझा राग आला. बाजुचे आचारी व कामगार यांनी राऊतांना मारण्यासाठी कोणी उलथणे, कुणी फाट्या, कुणी काठ्या घेतल्या व ही सर्व खवळलेली माणसे राऊतांच्या अंगावर धावून आली. राऊत एक पाऊलही मागे न सरता म्हणाले, ’’महाराज, तुम्ही चोपदाराकरवी निरोप पाठवून मला बोलाविलेत आपणास माझे मत तळमळीने नम्रपणे सांगितले आपण योग्य न्याय न देता सहकार्यांकरवी अतिरेक करीत आहात, हे आपणासारख्या उच्च पदावरील माणासाला शोभत नाही.
‘‘ आपणास दशम्या हव्यात ना? माझ्याकडे काही आहेत. आपल्याला देऊ घ्या ? ‘‘ महाराज वाटले. त्यांनी त्यांचे पाय धरले. दशम्या देण्याविषयी विनंती केली. त्या वारकर्याने आपल्या गाठोड्यातून दशम्या काढुन राऊताकडे दिल्या. त्यांनी त्या दगडावर ठेवला. परत त्याचे पाय धरले. वारकरी राऊतांना थोपटत व उठवत म्हणाला पंढरपूरच्या वाटेने चाललात या वाटेवर असे भांबावून घाबरून चालणार नाही.
आता पालखीला भक्कम पाया लाभला होता. चालणार्या वारकर्यांच्या पायाखाली जी वाळू होती ती संपली. आता ती सरकण्याचा प्रश्नच नव्हता सर्वानी जुने वयोवृद्ध व्यवहारे मामांना जवळ घेतले. पालखीचा मोठा ध्वज त्यांच्याजवळ दिला. त्यांना झेंडेकर्याचा मान दिला सर्व बांधवांनी दर्शन घेतल्यानंतर पुणे सोडले तरी अनेक बांधव पालखीबरोबर वडकी नाल्यापर्यंत सोबतीला आले.