श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा विशेष अंक
82 भवानी पेठ पुणे (तिळवण तेली समाज कार्यालय) येथे. श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळात श्री. मोहन देशमाने लिखीत श्री. संत संताजी महाराज जगनाडे संपुर्ण इतिहासाचे पुस्तकाचे प्रकाशन पालखी सोहळ्यात करण्यात आले.
- मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र.
वि. ल. भावे. व संत संताजी यांचा संबंध काय ? आशा काही ज्या घटना आहेत हे जेंव्हा आपण अभ्यासू तेंव्हा संत संताजी यांचा संबंध काय ? अभ्यासू तेंव्हा संत संताजी समजण्याचा मार्ग सापडतो १८६० ते ७० दरम्यान संत तुकारामांच्या अंभंगांचे मोडीतून देवनागरी कारण करणे सुरू झाले. परंतु फक्त महिपती आपल्या लेखनात म्हणतात चाकणचा संतु तेली तुकोबासह अभंग लेखन करी परंतू या दरम्यानच्या मंडळींनी संत संताजी हस्ताक्षरातील वह्या मान्य केल्या नाहित. ही वाटचाल अशीच सुरू होती. परंतू वि. ल. भावे यांनी १९२० च्या दरम्यान फक्त संत संताजींच्या अभांगावरून तुकोबा गाथा तयार केली.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (6)
का नुसती सिंहगर्जना, नुसत्याच जेवणावळी नुसताच संताजी उत्सव, वधुवर मेळावे समाज पातळीवरचा नुसताच संघर्ष म्हणजे समाज कार्य हे असे आहे म्हणुन मेटे कार्यक्रमात बोलणारच. दुबळ्यांचा निषेध मराठा व ब्राह्मण जमेस धरत नाहीत.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (5)
अगदी २००३ ला आसा राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसच्या शरद पवारांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी सुदूंबरे येथे मेळावा घेतला. आणी तारणकर्ते ठरणार म्हणुन मा. छगन भुजबळ यांच्या सह मा. जयदत्त क्षिरसागर यांना वाटले. पण सत्य काय याच वेळी मराठा - कुणबी ही अस्तीवात नसलेली जात निर्माण केली गेली. हे प्रमाण पत्र मिळवण्यासाठी काही लाख लागतात.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (4)
आपण आपल्या सह समाजाला ओबीसी संघर्षात आना तेंव्हा ते म्हणाले ओबीसीत दम नाही आता मला सांगा ४४ टक्के मधे तेली १० ते १२ टक्के मग या बहुसंख्य समाजाचे नेते जर संघर्षाच्या रस्त्यावरून पळुन जात असतील समाज पातळीवरील चिंतन शिबीरात संघर्षाची गर्जना देत असतील तर समाजाला या भूताबरोबर किती लढावयास लावणार. हा प्रश्न या ठिकाणाी उभ रहातो. कारण हे हाय कमांड जे बोलते तेच वाक्य जेंव्हा त्यांनी नेमलेले पदाधीकारी आगदी तसेच बोलतात तेंव्हा खर्या संघर्षा पासून समाज किती दूर आहे हे समोर येते.