तेली समाजाची संघर्षाची वाटचाल म्हणजे खा. तडस - प्रकाश गिधे उपाध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पु. जि.
मी तसा चळवळीतला माणुस दत्ता सामंत यांच्या संघटेनेचा घटक. तो मिल कामगारांचा लढा लढलो आणी गिरणीबंद पडताच गावाकडे आलो. जवळ होते शुन्य उभा राहिली आणी संघर्ष सुरू केला. हा संघर्ष एकट्याचा. माझे गाव डोंगर दर्यातले सर्व साधने कमी अंगावर पाऊस घेऊन लढताना जाणवले मी एकटा आहे. परंतु माझ्या सारखे परिस्थीतीने गंजलेले माझ्या गावात माझ्या तालुक्यात, हजारो आहेत. ही सर्व मंडळी पिचत भरडत रडत आहेत. त्याच्या जगण्याची धडपडीची जाणीव कुणालाच नाही. आपन एकत्र येऊ ही ओळख ही नव्हती आणी आपन असेच पोटातले दु:ख उरात ठेवून वावरावे ही आमची ठेवन होती.
समाज संघटन कसे असावे हे खा. तडसांनी राबवले आहे. - ज्ञानेश्वर दुर्गुडे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पुणे जिल्हा.
भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी कळसू बाईचा डोंगर कपारीतून बाहेर पडलो. भाकरी किती महाग असते हे होरपळून निघाल्या नंतर समजु लागले आपण आपली भाकरी नीट मिळवली तर ती मागे राहिलेल्या साठी मिळवण्याास हातभार लावू परंतू या लढाईत कष्ट हे करीत असताना मन कुरतडत होते. कुरतडणार्या मनातला समजावून उभा राहिलो. स्वत: स्थीर होताच समाज कार्यासाठी मन ओड घेत होते.
आ. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरथ असलेली देश पातळीवरील तैलिक साहू महासभेची मिटींग जवाहरलाल वसतीगृह नागपूर येथे 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या साठी देश पातळीवरील बांधव उपस्थीत रहाणार आहेत. तरी सर्व सभासद बंधुंनी व समाज बाधवांनी 19 मार्च रोजी जवाहर वसतीगृह नागपूर येथे उपस्थीत रहावे असे अवाहन मा. ईश्वर बाळबुधे यांनी आपल्या पुणे दौर्यात व्यक्त केले.
वर्धा - येथिल तेली समाजीतील युवक श्री. सारंग रघटाटे यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श युवा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने सदरचा पुरस्कार मुंबई येथे आयोजीत केला होता. ना. विनोद तावडे शिक्षण व युवक कल्याण मंत्री यांच्या शुभ हास्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्री. सारंग यांचे अभिनंदन खासदार रामदास तडस यांनी केले आहे. सर्व बांधवा तर्फे शुभेच्छा.
खासदारकीचा मी पणा विसरून वावरणारे खा. तडस :- उमेश साहू नागपूर
आमच्या 2/3 पिड्या विदर्भाच्या मातीत मुरलेल्या. या मातीने आपलेसे केलेले. या वावरण्यात समाजाचे आमदार म्हणून तडस साहेबांची ओळख झाली. आमच्या आडचनी समजावून घेतल्या त्या आडचनीवर चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. एक तेली म्हणून ते आमचे झाले. तेली समाजाच्या संघटनेत त्यांनी सामावून घेतले. त्यांचा जेंव्हा परिचय झाला तेंव्हा मी कोण विसरून आपण सर्व एक आहोत ही भुमीका ते वागण्यात बोलण्यातुन प्रकट करीत