Sant Santaji Maharaj Jagnade
सन 1900 च्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्या मधील कै. अंबाजी क्षिरसागर यांनी कुटूंबच बैलगाडीत बसवले. करडीच्या शोधात होते. करडी असेल तर तेलघाना चालेल तो चालला तर घर चालेल. सांगली मिरज करीत ते अथनी येथे गेले. या अथनीत काही काळ घाना सुर ठेवला. इथे ही निट जम बसेना. ओळखी पाळखी काढत हुबळी येथे पोहचले.
सातारा लगत असलेल्या भोर शहरातुन वडील पुण्यात आले शुन्यात उभे राहिले. या वेळी कै. माधवराव धोत्रे बांधकाम क्षेत्रात शिरले आगदी या क्षेत्रात एक कामगार म्हणुन उभे राहिले. पुणे शहर व डेक्कन परिसरात ते उत्कष्ट बाधकाम करणारे परिचीत झाले. त्यांच्या कामाची जाणीव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पर्यंत गेली. त्यांनी त्यांना कर्हाड येथे नेहले.
स्वातंत्र सेनानी शंकरराव धावडे एक स्वातंत्र सेनानी गोवा मुक्ती अंदोलनाच्या काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सह लढणारे समाज बांधव. मुंबई सह महाराष्ट्र झालाच पाहिजे या चळवळीतले म्होरके यासाठी अनेक वेळा तुरूंगात जावे लागले. कामगार व शेत मजुर यांच्या हाक्का साठी आयुष्यभर रस्त्यावर लढत राहिले. त्यातुन अनेक प्रश्न मार्गी लागले.
प. महाराष्ट्रातील डाव्या विचारसरणीचे एक लढवय्य नेते होते. समता, स्वातंत्र या विचार सरणीचे बांधव संपत्ती त्यांच्या उंबरठ्यावर आली होती. हुबळी येथील कै. काशिनाथ अंबाजी नांदगीरीकरांचे जावई. त्यांचे कुटुंबही तोलामोलाचे होते. पण या सर्वाकडे पाठ फिरवून, कामगार, शेतमजुर यांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावरची लढाई लढत होते. सामान्य माणसाची एक तळपती तलवार म्हणुन ते सर्वा बरोबर नव्हे तर सर्वा समोर.
पण विचाराची बैठक पक्की वृत्ती धार्मिक बरड गाव पंढरीच्या वाटेवर असलेले त्यामुळे दोन वेळेच्या जेवणाला सोबत वारकर्याची असावी. ही इच्छा तसे वारकरी भेटत, जर नाहीच भेटले तर त्यांचा शिधा काढुन प्रथम ठेवत. आळंदीं त पंढरपुर मार्गावर आषाढी व कार्तीक वारीला वारकरी याच बरड गावातुन जातात. या मार्गावर बरड येथे मुक्काम पालखीचा आसतो अर्जुनशेठ यांनी आपल्या जीवनभर पालखीच्या मुक्कामा दिवशी पुर्ण पालखीलाच पोटभर जेवन दिले. हिंदु धर्मावर त्यांची निष्ठा त्यामुळे हिंदु धर्माचे शंकराचार्य ही त्यांची नोंद ठेवत असत नव्हे तर प्रत्यक्ष दौर्यात भेटत असत.