Sant Santaji Maharaj Jagnade
पूर्वी आमच्या आजोबाच्या काळात आमचे आजोबा गावाच्या आजुबाजूच्या परिसरातील गावे, वाड्यांमधून सावकार म्हणून प्रसिद्ध होते. आजोबाच्या काळात सुमारे १२०० एकर शेती होती. सर्व शेती पावसावर अवलंबून होती. परंतु पूर्वी पावसाचे प्रमाण योग्य प्रमाणात असल्याने घरामध्ये धान्याच्या राशी लागत होत्या. आमचे घर म्हणजे १२ खण, ९६ पत्र्यांचा वाडा होता. इतक्या मोठे घर असून धान्य ठेवायला जागा पुरत नव्हती, म्हणून सुमारे १५० पोती ज्वारी तळघरात साठवून ठेवावी लागत असे.
पुणे :- येथील तिळवण तेली समाज कार्यालयात श्री. मोहन देशमाने यांनी लिहीलेल्या महाराष्ट्राची अस्मिता श्री. संत संताजी महाराज या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करिताना मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. श्री देशमाने म्हणाले, संत तुकाराम यांचे लेखनीक हा संत संताजींचा एक भाग आहे. परंतु तुकारामांनी जी सामाजिक क्रांती केली त्या क्रांतीमधील ते एक पहिले प्रमुख आहेत. ब्राह्मणशाही व मोंगलशाही यांच्या आतेरेकी वाटचालीत त्यांनी अभंग जपले व जगाला दिले हे विसरून चालणार नाहीत. समाज बांधवांना अव्हान करिताच मदतीचा पाऊस पडला यातुन आठ हजार प्रती छापल्यात. त्या समाज बांधवांना मोफत दिल्या जाणार आहेत. श्री. संत संताजी तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे अध्यक्ष श्री. जर्नादन जगनाडे यांनी श्री. संत संताजींच्या कार्याला उजाळा येईल. श्री. मोहन देशमाने आपल्या सुदूंबरे संस्थेत प्रसिद्धी प्रमुख आहेत. त्यांनी संस्थेच्या कार्याला हे सहकार्य केले आहे. त्यांची उचित जाणीव संस्था नजीकच्या काळात ठेवेल श्री. सुंदुंबरे संस्था अध्यक्ष या नात्याने कारभार करिताना सहकार्य मिळते तद्वत काही सहकार्य करतो म्हणतात पण करित नाहीत यावर ही त्यांनी आपले विचार मांडले.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 6) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
होय मी तेली आहे. मी आहे तो आहे. माझे मत तेली मत आहे. स्वातंत्र्यात सत्ते पासुन तुम्ही दुर ठेवू शकत नाही. लोकशाही म्हणजे, समता सांगते. परंतु निवडणूकीच्या फडात आमची मते हवी असतात. विकासाची साधी पाऊल वाट ही समाजाला देत नाहीत ही त्यांची खरी पोटतीडीक विधान परिषदेत ते त्याच भुमीकेने वागत. स्वातंत्र्य उत्तर काळात देशपातळीवरील सुज्ञ बांधवांनी भारतीय तैलीक साहु महासभा स्थापन झाली होती. तिचा विस्तार महाराष्ट्रात डिंग्रजचे आमदार माधवराव पाटील यांनी सुरू केला. प्रथम ही संघटना विदर्भात मुळे रोवुन उभी राहिली. समाजमाता केरकाकु क्षिरसागर यांनी मराठवाड्यात प्रांतिक अध्यक्ष म्हणुन उभी केली.
ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक संस्था, मुंडळे आपआपल्या परीने स्वागताच्या जय्यत तयारीला लागले आहेत. मात्र यंदा ठाण्यातील प्रतिष्ठीत पाच संस्था एकत्र येऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणार आहेत. यावर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यातील अलिखीत कराराच्या चलचित्राचा रथ तयार करणार आहेत.
ठाण्यात यंदा ठाणे महानगर तेली समाज ठाणे, श्री संताजी सहायक संघ ठाणे, श्री. संताजी तेली समाज उत्कर्ष मंडळ मुंब्रा., रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था ठाणे मंचद्वारे संयुक्तरीत्या स्वागतयात्रा काढणार आहेत. मागील वर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंग लिहिण्याचे काम हे संताजी महाराज यांनी केले., तेच संत तुकाराम महाराज यांचे अभंग व संताजी महाराजांनी लिहिलेल अभंग चित्ररथात ठेवण्यात आले होते व त्यापासुन वारकरीपंथाला अवगत करून देण्यात आले होत.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग7)
या देशाचे पंतप्रधान मोदीच यावेत ही वातावरण निर्मीती जेंव्हा सुरू होती तेंव्हा आजचे वाचाळ विर गप्प होते. घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला बसवणे व विकास साधने ही ध्यये मा. नरेंद्र मोदींचे होते व आज ही आहे ही मान्य करू. आपण सर्वांनी समन्व्य साधला मोदींच्या विकासा बरोबर मत देताना समोर हे वाचाळ विर भगावतांचा आरक्षणाचा कडवट पणा विसरता येतो हे मोदी वादळात स्पष्ट झाले. आणी क्षत्रीय किंवा ब्राह्मण नव्हे तर फक्त जन्माने मागास वर्गीय असलेल्या मा. मोंदीच्या विकासात प्रेमात देश सामावला गेला. हे वास्तव मा. मोदी पंतप्रधान होण्यातील आहे.