Sant Santaji Maharaj Jagnade
समाजा विषयी तळमळ, त्याग व प्रेम आपण ठेवले तर समाज ही आपल्याला साथ सोबत देतो. आपल्या कामावर निष्ठा. सर्वांची मते जाणुण सर्वांना सोईस्कर निर्णय घेणे ही त्यांच्या कामाची पद्धत अनेकांची घडन करण्यास उपयुक्त ठरली आहे. मी एक तसा तैलिक समाज महासभेचा कार्यकर्ता. संघटनेने जबाबदारी दिली म्हणुन काम करू लागलो समाजाच्या कामा निमित्त त्यांना मंत्रालयात भेटण्यास प्रसंग आले. या वेळी संघटनेचा पदाधीकारी पेक्षा माझा समाज बांधव ही त्यांनी दिलेली वागणूक विसरता येत नाही. आलेला बांधव जेवला का ? नसेल तर जेवन करावयास चला ही त्यांची आपुलकी बरेच काही सांगुन जाते. मी तुमचा आहे. तुमच्यातील एक आहे. फक्त त्या मतदार संघातील आपल्या बांधवांनी मला समाज बांधव म्हणुन भरघेस मतदान केले हणुन मी खासदार झालो. ही त्यांची नम्रता पावलो पावली दिसते. ही जाणीव आजच्या बदलत्या जमान्यात सहज सापडत नाही. याहीपुढे जाऊन त्यांनी पुढचा पल्ला गाठला. खरे तर आम्ही त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यास गेलो होतो. परंतु त्यांनी महाराष्ट्र मंत्री मंडळातील उपस्थीत असलेल्या काही मंत्र्यांची आमची ओळख करून ही दिली. यतुन माझा समाज बांधव कामा निमित्त आला तर त्यांना सहकार्य करा हा ही सल्ला दिला.
मदनसिंग चावरे, जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जातीजमाती भाजपा
राष्ट्रपिता महात्मा गांधी, भुदान यज्ञाचे प्रणेते जगविख्यात आचार्य विनोबाजी भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती डॉ. सुशील नायर आणि सहकार महर्षी स्व. दादाजी देशमुख यांच्या कर्मभुमीत देवळी येथे दि. 1 एप्रिल 1954 रोजी रामदासजी तडस यांचा जन्म झाला. वयाची 62 वर्ष पुर्ण करणार्या या पैलवानाचा आजचा उत्साह एखाद्या तरुणास लाजवेल एवढा आहे. आज रामदासजींचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना समस्त जनतेसोबत माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
संत संताजी अध्यासन - तेली समाज
पश्चिम महारष्ट्रात समाजाची फार मोठी शोकांतिका आहे. गावाच्या शहराच्या मुख्य प्रवाहा पासुन नेतृत्व व कर्तृत्व बंदिस्त झाले. अशी वस्तुस्थीती असताना ही वाडा, नाने, पौड, राहु या हाताच्या बोटावर मोजले जावे आशा गावावर समाजाचा कायम स्वरूपी पकड आहे. त्या गावचा विकास तेली समाजाच्या घरातुन सुरू होतो. ही वास्तवता आज ही आहे. यातुन नेतृत्वाची मक्तेदारी तुम्ही जर आम्हाला दिली तर आम्ही गावाचा कारभार तुमच्या पेक्षा कणभर श्रेष्ठ करु शकतो.
वर्धा माझे माहेर पण अाता माहेर राहिलेलच नाही आम्ही दोघेच भाऊ बहिण, आई, बाबा, भाऊ, बहिणी सर्वच गेले त्यामुळे माहेरी कुणीच नाही पण माहेर या शब्दात खुप ओलावा प्रेम, सद्भाव, शक्ती सार काही समावलेल आणि हे माहेरपण अनुभवायला मिळालं रामदासजी तडस यांच्याकडे.
ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक संस्था, मुंडळे आपआपल्या परीने स्वागताच्या जय्यत तयारीला लागले आहेत. मात्र यंदा ठाण्यातील प्रतिष्ठीत पाच संस्था एकत्र येऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणार आहेत. यावर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यातील अलिखीत कराराच्या चलचित्राचा रथ तयार करणार आहेत.
ठाण्यात यंदा ठाणे महानगर तेली समाज ठाणे, श्री संताजी सहायक संघ ठाणे, श्री. संताजी तेली समाज उत्कर्ष मंडळ मुंब्रा., रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था ठाणे मंचद्वारे संयुक्तरीत्या स्वागतयात्रा काढणार आहेत. मागील वर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंग लिहिण्याचे काम हे संताजी महाराज यांनी केले., तेच संत तुकाराम महाराज यांचे अभंग व संताजी महाराजांनी लिहिलेल अभंग चित्ररथात ठेवण्यात आले होते व त्यापासुन वारकरीपंथाला अवगत करून देण्यात आले होत.