ओबीसी समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे .. महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभेचे राज्यपालांना निवेदन .
भारतामध्ये सर्वप्रथम जनगणना १८७२ मध्ये झालेली होती आणि १८८१ पासुन दर १० वर्षांनी जनगणना होत आहे. भारतामध्ये १९३१ पर्यंत प्रत्येक जातीची जनगणना होत होती व यात प्रत्येक जातीची संख्या व शैक्षणिक, आर्थिक परिस्थीती बाबतची संपुर्ण माहिती यामध्ये नमुद करण्यात येत होती. तसेच १९४१ मध्ये सुध्दा जनगणनेत जातीचा कॉलम होता. १९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसीमध्ये ३७४३ जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.वकृत्व स्पर्धा दोन गटात असून स्पर्धेसाठी " संताजी महाराजांचा इतिहास " हा विषय असून स्पर्धकाने २ मिनिटांचा व्हिडिओ चित्रीकरण करून पाठवायचा आहे. स्पर्धा फक्त तेली समाजासाठी मर्यादित असून स्पर्धेसाठी तयार व्हिडिओ दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवायचे आहेत.
पुणे - 8 डिसेंबर तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती उत्सव छावणी येथील सुभाष रत्नपारखी यांच्या निवास्थानी साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणन श्री.निलेश धारकर तसेंच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष रत्नपारखे हे होते.
संतू म्हणे मी तेल काढीयले । म्हणूनी नाव दिले संतू तेली ।। संतु तेली घाणा करी। घाणा केल्यावर तुक्याचे अभंग लिही ।।
थोर संत संताजी जगनाडे महाराज म्हटलं की सोबत संत तुकाराम महाराज यांचे विचार आणि त्यांची गाथा डोळ्यासमोर उभी राहते. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1664 रोजी पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला.
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी ८ डिसेंबर १६२४रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. त